शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

अमृत योजनेमुळे पडीक जागांवर फुलली हिरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:32 IST

१५ हजार नवीन झाडे; उद्यानांमध्ये भर

- योगेश पिंगळेनवी मुंबई : केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे अमृत योजनेमुळे नवी मुंबई शहरातील नेरु ळ, सानपाडा, वाशी आणि घणसोली येथील हिरवळीसाठी आरक्षित असलेल्या, परंतु पडीक पडलेल्या जागांवर हिरवळ दाटली आहे. या योजनेअंतर्गत विविध फळे आणि फुलांची सुमारे १५ हजार झाडे लावण्यात आली असून यामुळे शहराच्या उद्यानांमध्ये देखील भर पडली आहे.नवी मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून शेकडो उद्याने विकसित करण्यात आली आहेत. याठिकाणी ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, खेळणी आदी सुविधा देण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी देखील पसंती दिली आहे. देशातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारावा तसेच देशात स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार व्हावीत शहरामधील मोकळ्या जागांवर हरित क्षेत्र निर्माण व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील विविध शहरांमध्ये अमृत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ७५ टक्के राज्य शासनाकडून २५ टक्के आणि महापालिकेचा २५ टक्के निधी वापरला जातो. सदर योजना राज्यातील सुमारे ४३ शहरांमध्ये राबविण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने पडीक भूखंडांवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून आंबा, निम, नारळ, सुपारी, काजू, चिकू, पेरू आदी फळझाडे आणि फुलझाडे लावली आहेत. २0१५-१६ मध्ये नेरु ळ सेक्टर २६ मधील ज्वेल पार्क येथे सुमारे १२ हजार चौरस मीटर जागेवर हरित क्षेत्र निर्माण करून सुमारे १९२४ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. २0१६ - १७ मध्ये घणसोली सेक्टर ९ येथे नाल्यालगत आरक्षित आणि पडीक सुमारे १२ हजार चौरस मीटर क्षेत्रात हरित क्षेत्र निर्माण करून सुमारे ३८४५ वृक्षांची लागवड केली आहे.२0१७ - १८ मध्ये सानपाडा सेक्टर ३0 ए आणि वाशी सेक्टर १0 ए या दोन्ही ठिकाणी सुमारे १५ ते १८ हजार चौरस मीटर क्षेत्रात सुमारे ८९६८ वृक्षांची लागवड केली. याशिवाय नागरिकांसाठी नैसर्गिक पदपथ तयार करण्यात आला असून लॉन विकसित करण्यात आली आहे. विविध झाडांच्या जाती, त्यांची नावे, फायदे, झाडांमुळे येणारे विविध पक्षी, फुलपाखरे याबाबत माहिती असलेले फलक बसविण्यात आले आहेत. अमृत अभियानामुळे शहरात वृक्षांची संख्या वाढली असून शहरातील उद्यानामध्ये देखील भर पडली आहे.