शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अमृत योजनेमुळे पडीक जागांवर फुलली हिरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:32 IST

१५ हजार नवीन झाडे; उद्यानांमध्ये भर

- योगेश पिंगळेनवी मुंबई : केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे अमृत योजनेमुळे नवी मुंबई शहरातील नेरु ळ, सानपाडा, वाशी आणि घणसोली येथील हिरवळीसाठी आरक्षित असलेल्या, परंतु पडीक पडलेल्या जागांवर हिरवळ दाटली आहे. या योजनेअंतर्गत विविध फळे आणि फुलांची सुमारे १५ हजार झाडे लावण्यात आली असून यामुळे शहराच्या उद्यानांमध्ये देखील भर पडली आहे.नवी मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून शेकडो उद्याने विकसित करण्यात आली आहेत. याठिकाणी ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, खेळणी आदी सुविधा देण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी देखील पसंती दिली आहे. देशातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारावा तसेच देशात स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार व्हावीत शहरामधील मोकळ्या जागांवर हरित क्षेत्र निर्माण व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील विविध शहरांमध्ये अमृत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ७५ टक्के राज्य शासनाकडून २५ टक्के आणि महापालिकेचा २५ टक्के निधी वापरला जातो. सदर योजना राज्यातील सुमारे ४३ शहरांमध्ये राबविण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने पडीक भूखंडांवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून आंबा, निम, नारळ, सुपारी, काजू, चिकू, पेरू आदी फळझाडे आणि फुलझाडे लावली आहेत. २0१५-१६ मध्ये नेरु ळ सेक्टर २६ मधील ज्वेल पार्क येथे सुमारे १२ हजार चौरस मीटर जागेवर हरित क्षेत्र निर्माण करून सुमारे १९२४ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. २0१६ - १७ मध्ये घणसोली सेक्टर ९ येथे नाल्यालगत आरक्षित आणि पडीक सुमारे १२ हजार चौरस मीटर क्षेत्रात हरित क्षेत्र निर्माण करून सुमारे ३८४५ वृक्षांची लागवड केली आहे.२0१७ - १८ मध्ये सानपाडा सेक्टर ३0 ए आणि वाशी सेक्टर १0 ए या दोन्ही ठिकाणी सुमारे १५ ते १८ हजार चौरस मीटर क्षेत्रात सुमारे ८९६८ वृक्षांची लागवड केली. याशिवाय नागरिकांसाठी नैसर्गिक पदपथ तयार करण्यात आला असून लॉन विकसित करण्यात आली आहे. विविध झाडांच्या जाती, त्यांची नावे, फायदे, झाडांमुळे येणारे विविध पक्षी, फुलपाखरे याबाबत माहिती असलेले फलक बसविण्यात आले आहेत. अमृत अभियानामुळे शहरात वृक्षांची संख्या वाढली असून शहरातील उद्यानामध्ये देखील भर पडली आहे.