शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

पनवेल विभागामध्ये विद्युत मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:12 IST

ग्राहकांना वाढीव बिलाचा भुर्दंड : मीटर बदलून देण्यास महावितरणकडून चालढकल; शहरवासीयांची नाराजी

कळंबोली : पनवेल परिसरात नादुरुस्त विद्युत मीटरच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या नादुरुस्त विद्युत मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत देयके पाठविली जातात. हे मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी अर्ज केले आहेत; परंतु महावितरणच्या पनवेल कार्यालयात नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या पनवेल मंडळात सिडको वसाहती, पनवेल शहर त्याचबरोबर ग्रामीण भाग आणि उरणचा समावेश आहे. या ठिकाणी लाखो वीजग्राहक आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामध्ये व्यावसायिक, घरगुती आणि औद्योगिक प्रकारच्या वीजजोडण्या आहेत.मागील वर्षाच्या तुलनेत पनवेल परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण घटले आहे; परंतु अनेक ग्राहकांना वाढीव देयके येत असल्याच्या तक्रारी आहेत.

कामोठे वसाहतीतील रहिवाशांच्या या संदर्भात अधिक तक्रारी आहेत. या विभागातील ३०० ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानाला ६३ हजार रुपयांचे देयके पाठविल्याची उदाहरणे आहेत. हे प्रतिनिधिक उदाहरण असले, तरी या क्षेत्रात अनेकांना विजेच्या वापरापेक्षा अधिक देयके पाठविली जात असल्याच्या तक्रारी आहेत. नियमित विद्युत मीटरची रिडिंग न घेणे, सरासरी देयके पाठविणे आदीमुळे वाढीव देयके पाठविली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, शहरात विद्युत मीटर नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळेही ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. नादुरुस्त मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज केले आहेत; परंतु महावितरणकडे नवीन विद्युत मीटरच नसल्याने याचा फटका ग्राहकांना बसत आहे, त्यामुळे महावितरणच्या अडचणीसुद्धा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाही करून मागणीनुसार नवीन विद्युत मीटर बदलून मिळावेत, 

 

ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन मीटर उपलब्ध आहेत. विशेषत: सिंगल फेजच्या मीटरचा पुरेसा साठा आहे; परंतु थ्री फेज आणि नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी पुरेसे मीटर नाहीत. त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न सुरू असून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढला जाईल.- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता, महावितरण अशी मागणी पनवेल विभागातील ग्राहकांनी केली आहे. 

बिघाड झालेल्या मीटरमुळे जास्त किंवा कमी रिडिंग येते, त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या रिडिंग प्रमाणे वीजबिल पाठवले जात नाही. या कारणाने ग्राहकांची चूक नसतानाही त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. अवास्तव वीजबिल आल्याने महावितरणच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.- आनंद भंडारी, वीजग्राहक, नवीन पनवेल