शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल विभागामध्ये विद्युत मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:12 IST

ग्राहकांना वाढीव बिलाचा भुर्दंड : मीटर बदलून देण्यास महावितरणकडून चालढकल; शहरवासीयांची नाराजी

कळंबोली : पनवेल परिसरात नादुरुस्त विद्युत मीटरच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या नादुरुस्त विद्युत मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत देयके पाठविली जातात. हे मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी अर्ज केले आहेत; परंतु महावितरणच्या पनवेल कार्यालयात नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या पनवेल मंडळात सिडको वसाहती, पनवेल शहर त्याचबरोबर ग्रामीण भाग आणि उरणचा समावेश आहे. या ठिकाणी लाखो वीजग्राहक आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामध्ये व्यावसायिक, घरगुती आणि औद्योगिक प्रकारच्या वीजजोडण्या आहेत.मागील वर्षाच्या तुलनेत पनवेल परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण घटले आहे; परंतु अनेक ग्राहकांना वाढीव देयके येत असल्याच्या तक्रारी आहेत.

कामोठे वसाहतीतील रहिवाशांच्या या संदर्भात अधिक तक्रारी आहेत. या विभागातील ३०० ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानाला ६३ हजार रुपयांचे देयके पाठविल्याची उदाहरणे आहेत. हे प्रतिनिधिक उदाहरण असले, तरी या क्षेत्रात अनेकांना विजेच्या वापरापेक्षा अधिक देयके पाठविली जात असल्याच्या तक्रारी आहेत. नियमित विद्युत मीटरची रिडिंग न घेणे, सरासरी देयके पाठविणे आदीमुळे वाढीव देयके पाठविली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, शहरात विद्युत मीटर नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळेही ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. नादुरुस्त मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज केले आहेत; परंतु महावितरणकडे नवीन विद्युत मीटरच नसल्याने याचा फटका ग्राहकांना बसत आहे, त्यामुळे महावितरणच्या अडचणीसुद्धा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाही करून मागणीनुसार नवीन विद्युत मीटर बदलून मिळावेत, 

 

ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन मीटर उपलब्ध आहेत. विशेषत: सिंगल फेजच्या मीटरचा पुरेसा साठा आहे; परंतु थ्री फेज आणि नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी पुरेसे मीटर नाहीत. त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न सुरू असून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढला जाईल.- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता, महावितरण अशी मागणी पनवेल विभागातील ग्राहकांनी केली आहे. 

बिघाड झालेल्या मीटरमुळे जास्त किंवा कमी रिडिंग येते, त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या रिडिंग प्रमाणे वीजबिल पाठवले जात नाही. या कारणाने ग्राहकांची चूक नसतानाही त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. अवास्तव वीजबिल आल्याने महावितरणच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.- आनंद भंडारी, वीजग्राहक, नवीन पनवेल