शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक

By admin | Updated: September 21, 2014 00:58 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी पार पडणार आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शेकापचे सर्वेसर्वा आ. जयंत पाटील या दोन दिग्गज नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शिवतिर्थावर लागले आहे.
जिल्हा परिषदेवर सध्या शेकाप-शिवसेना यांची सत्ता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी बाकावर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत शेकापने स्वतंत्र उमेदवार उभा करुन शिवसेनेची गोची केल्याने शिवसेना कमालीची संतप्त झाली. लोकसभेच्या निकालानंतर शिवतिर्थावर सत्ता परिवर्तनाचे वारे वाहु लागेल आहेत. शिवसेनेसोबत मांडलेली चूल मोडून शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे नवे समीकरण जन्माला येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्गा परिषदेतील पक्षप्रतोद महेंद्र दळवी यांनी आपली उमेदवारी पक्की समजली आहे. त्यांनी त्या दिशेने प्रयत्नही सुरु केले असून त्यांनी शिवसेनेच्या सदस्यांना हाताशी धरुन अध्यक्षपदाची खुर्ची काबीज करण्याची तयारी केली आहे. परंतु शिवसेनेने मदत करायचे ठरविले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे किती सदस्य दळवी यांच्या पाठीशी ठाम राहतील हे पाहणो औत्सुक्याचे ठरेल. तटकरे यांनी दळवी यांना अध्यक्षपदासाठी तयारी करा असे सांगितल्याचे स्वत: दळवीच सांगत आहे. त्यामुऴे तटकरे यांच्या मनात नेमकी काय राजकीय खेळी सुरु आहे, हे सांगणो अवघड आहे.
शेकापचे जिल्हा परिषद प्रतोद पंडीत पाटील यांनी सदस्यांना व्हीप बजावणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे शेकापचे सदस्य कारवाईच्या भितीने वाकडे पाऊल टाकणार नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे.  तसेच  प्रतोद दळवी यांनाही तटकरेंच्या आदेशाने व्हीप बजावावा लागल्यास दळवी कोणती भूमिका घेतात. हे ही पाहणो महत्वाचे आहे.
तटकरे यांनी शेकापच्या मदतीने अध्यक्षपदी त्यांच्या वहीनी शुभदा तटकरे यांची वर्णी लावल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. असे समिकरण झाले तर, शेकापच्या जिपसदस्य चित्र पाटील या उपाध्यक्ष होतील अशीही चर्चा आहे. शेकाप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत जिल्ह्यातील राजकीय समिकरणो बदलण्यास पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. जिल्हा परिषदेवर ज्याची सत्ता असेल त्यांना जिह्याचे राजकारण करणो सुलभ होणार आहे.  सुनिल तटकरे आणि जयंत पाटील हे धुरंदर राजकारणी असल्याने ते दुरदृष्टीचे राजकारण करतील असे सध्या तरी चित्र आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून शिवतिर्थाच्या 5क्क् मीटर परिसरात प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावाधीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 4 वाजेर्पयत निकाल स्पष्ट होईल.  (प्रतिनिधी)