शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक

By admin | Updated: September 21, 2014 00:58 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी पार पडणार आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शेकापचे सर्वेसर्वा आ. जयंत पाटील या दोन दिग्गज नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शिवतिर्थावर लागले आहे.
जिल्हा परिषदेवर सध्या शेकाप-शिवसेना यांची सत्ता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी बाकावर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत शेकापने स्वतंत्र उमेदवार उभा करुन शिवसेनेची गोची केल्याने शिवसेना कमालीची संतप्त झाली. लोकसभेच्या निकालानंतर शिवतिर्थावर सत्ता परिवर्तनाचे वारे वाहु लागेल आहेत. शिवसेनेसोबत मांडलेली चूल मोडून शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे नवे समीकरण जन्माला येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्गा परिषदेतील पक्षप्रतोद महेंद्र दळवी यांनी आपली उमेदवारी पक्की समजली आहे. त्यांनी त्या दिशेने प्रयत्नही सुरु केले असून त्यांनी शिवसेनेच्या सदस्यांना हाताशी धरुन अध्यक्षपदाची खुर्ची काबीज करण्याची तयारी केली आहे. परंतु शिवसेनेने मदत करायचे ठरविले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे किती सदस्य दळवी यांच्या पाठीशी ठाम राहतील हे पाहणो औत्सुक्याचे ठरेल. तटकरे यांनी दळवी यांना अध्यक्षपदासाठी तयारी करा असे सांगितल्याचे स्वत: दळवीच सांगत आहे. त्यामुऴे तटकरे यांच्या मनात नेमकी काय राजकीय खेळी सुरु आहे, हे सांगणो अवघड आहे.
शेकापचे जिल्हा परिषद प्रतोद पंडीत पाटील यांनी सदस्यांना व्हीप बजावणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे शेकापचे सदस्य कारवाईच्या भितीने वाकडे पाऊल टाकणार नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे.  तसेच  प्रतोद दळवी यांनाही तटकरेंच्या आदेशाने व्हीप बजावावा लागल्यास दळवी कोणती भूमिका घेतात. हे ही पाहणो महत्वाचे आहे.
तटकरे यांनी शेकापच्या मदतीने अध्यक्षपदी त्यांच्या वहीनी शुभदा तटकरे यांची वर्णी लावल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. असे समिकरण झाले तर, शेकापच्या जिपसदस्य चित्र पाटील या उपाध्यक्ष होतील अशीही चर्चा आहे. शेकाप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत जिल्ह्यातील राजकीय समिकरणो बदलण्यास पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. जिल्हा परिषदेवर ज्याची सत्ता असेल त्यांना जिह्याचे राजकारण करणो सुलभ होणार आहे.  सुनिल तटकरे आणि जयंत पाटील हे धुरंदर राजकारणी असल्याने ते दुरदृष्टीचे राजकारण करतील असे सध्या तरी चित्र आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून शिवतिर्थाच्या 5क्क् मीटर परिसरात प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावाधीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 4 वाजेर्पयत निकाल स्पष्ट होईल.  (प्रतिनिधी)