शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

विजेच्या लपंडावामुळे उद्योजकांना आर्थिक भुर्दंड; तळोजा एमआयडीसीतील उद्योजक त्रस्त

By नामदेव मोरे | Updated: October 9, 2023 16:42 IST

कोल्डस्टोरेज चालकांना लाखो रूपयांचा फटका : २० दिवसात १२ वेळा बत्ती गुल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तळोजा औद्योगीक वसाहतीमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. २० दिवसामध्ये १२ वेळा बत्ती गुल झाल्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. कोल्डस्टोरेज व इतर व्यवसायीकांना विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे जनरेटरचा वापर करावा लागत आहे. डिझेलसाठी लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्यामुळे उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

राज्यातील महत्वाच्या औद्योगीक वसाहतीमध्ये तळोजा एमआयडीसीचा समावेश आहे. जेएनपीटी बंदर जवळ असल्यामुळे कृषी माल व इतर वस्तूंचा साठा करणारी अनेक कोल्ड स्टोरेज या परिसरामध्ये आहेत. याशिवाय इतर अनेक महत्वाचे कारखाने या परिसरात आहे. एमआयडीसीमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये विजेचा लपंडावाचाही समावेश आहे. विजपुरवठा कधी खंडीत होईल याचा काहीच भरोवसा राहिलेला नाही.सोमवारी पहाटे ७.३७ वाजता वीजपुरवठा बंद झाला तो ७.५० ला पुर्ववत झाला. रविवारी सकाळी ९ वाजता विज गेली ती २० मिनीटांनी परत आली. सायंकाळी ९ वाजता विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर पाऊसतास अंधाराचीच स्थिती होती. मागील २० दिवसामध्ये १२ वेळा अशाप्रकारे लपंडावाला सामोरे जावे लागते आहे. कधी १० ते १५ मिनीट तर कधी १ ते २ तास बत्तीगुलची स्थिती असते.

विजपुरवठा खंडीत झाला की काही कारखान्यांमधील काम पूर्णपणे बंद होते. पण कोल्डस्टोरेज सारख्या उद्योजकांना एक मिनीटही विजपुरवठा बंद ठेवून चालत नाही. कोल्डस्टोरेजमध्ये ठेवलेली फळे, भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ, मांस व इतर नाशिवंत कृषी व कृषीपुरक वस्तू योग्य तापमानामध्ये ठेवाव्या लागतात. मांस व इतर वस्तूंना उणे तापमान आवश्यक असते. यामुळे विजपुरवठा खंडीत झाला तर उच्च क्षमतेच्या जनरेटरच्या सहाय्याने कारखाने सुरू ठेवावे लागतात. यासाठी डिझेलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. लहान उद्योजकांना हजारो रुपये तर मोठ्या कोल्डस्टोरेज चालकांना लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विजेचा लपंडावा कायमस्वरूपी थांबवावा अशी मागणी उद्याेजकांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.

उत्पादनावरही परिणामविजेच्या लपंडावामुळे कोल्ड स्टोरेज चालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. इतर कारखान्यांमधील उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे. विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यानंतर कामकाज ठप्प होते व मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे विद्यूतपुरवठा सुरळीत होईल यावर लक्ष द्यावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

कोल्डस्टोरेजमधील कृषी माल योग्य तापमानामध्ये ठेवावा लागतो. विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे जनरेटरचा वापर करावा लागतो. यामुळे इंधनावर हजारो रूपयांचा खर्च होत आहे. महावितरण प्रशासनाने विजेचा लपंडाव बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.- निलिमा गणेश नाईक, संचालिका - जय रिद्दी व्हेंचर 

टॅग्स :MIDCएमआयडीसीelectricityवीज