शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

विजेच्या लपंडावामुळे उद्योजकांना आर्थिक भुर्दंड; तळोजा एमआयडीसीतील उद्योजक त्रस्त

By नामदेव मोरे | Updated: October 9, 2023 16:42 IST

कोल्डस्टोरेज चालकांना लाखो रूपयांचा फटका : २० दिवसात १२ वेळा बत्ती गुल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तळोजा औद्योगीक वसाहतीमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. २० दिवसामध्ये १२ वेळा बत्ती गुल झाल्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. कोल्डस्टोरेज व इतर व्यवसायीकांना विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे जनरेटरचा वापर करावा लागत आहे. डिझेलसाठी लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्यामुळे उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

राज्यातील महत्वाच्या औद्योगीक वसाहतीमध्ये तळोजा एमआयडीसीचा समावेश आहे. जेएनपीटी बंदर जवळ असल्यामुळे कृषी माल व इतर वस्तूंचा साठा करणारी अनेक कोल्ड स्टोरेज या परिसरामध्ये आहेत. याशिवाय इतर अनेक महत्वाचे कारखाने या परिसरात आहे. एमआयडीसीमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये विजेचा लपंडावाचाही समावेश आहे. विजपुरवठा कधी खंडीत होईल याचा काहीच भरोवसा राहिलेला नाही.सोमवारी पहाटे ७.३७ वाजता वीजपुरवठा बंद झाला तो ७.५० ला पुर्ववत झाला. रविवारी सकाळी ९ वाजता विज गेली ती २० मिनीटांनी परत आली. सायंकाळी ९ वाजता विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर पाऊसतास अंधाराचीच स्थिती होती. मागील २० दिवसामध्ये १२ वेळा अशाप्रकारे लपंडावाला सामोरे जावे लागते आहे. कधी १० ते १५ मिनीट तर कधी १ ते २ तास बत्तीगुलची स्थिती असते.

विजपुरवठा खंडीत झाला की काही कारखान्यांमधील काम पूर्णपणे बंद होते. पण कोल्डस्टोरेज सारख्या उद्योजकांना एक मिनीटही विजपुरवठा बंद ठेवून चालत नाही. कोल्डस्टोरेजमध्ये ठेवलेली फळे, भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ, मांस व इतर नाशिवंत कृषी व कृषीपुरक वस्तू योग्य तापमानामध्ये ठेवाव्या लागतात. मांस व इतर वस्तूंना उणे तापमान आवश्यक असते. यामुळे विजपुरवठा खंडीत झाला तर उच्च क्षमतेच्या जनरेटरच्या सहाय्याने कारखाने सुरू ठेवावे लागतात. यासाठी डिझेलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. लहान उद्योजकांना हजारो रुपये तर मोठ्या कोल्डस्टोरेज चालकांना लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विजेचा लपंडावा कायमस्वरूपी थांबवावा अशी मागणी उद्याेजकांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.

उत्पादनावरही परिणामविजेच्या लपंडावामुळे कोल्ड स्टोरेज चालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. इतर कारखान्यांमधील उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे. विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यानंतर कामकाज ठप्प होते व मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे विद्यूतपुरवठा सुरळीत होईल यावर लक्ष द्यावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

कोल्डस्टोरेजमधील कृषी माल योग्य तापमानामध्ये ठेवावा लागतो. विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे जनरेटरचा वापर करावा लागतो. यामुळे इंधनावर हजारो रूपयांचा खर्च होत आहे. महावितरण प्रशासनाने विजेचा लपंडाव बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.- निलिमा गणेश नाईक, संचालिका - जय रिद्दी व्हेंचर 

टॅग्स :MIDCएमआयडीसीelectricityवीज