शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावामुळे उद्योजकांना आर्थिक भुर्दंड; तळोजा एमआयडीसीतील उद्योजक त्रस्त

By नामदेव मोरे | Updated: October 9, 2023 16:42 IST

कोल्डस्टोरेज चालकांना लाखो रूपयांचा फटका : २० दिवसात १२ वेळा बत्ती गुल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तळोजा औद्योगीक वसाहतीमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. २० दिवसामध्ये १२ वेळा बत्ती गुल झाल्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. कोल्डस्टोरेज व इतर व्यवसायीकांना विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे जनरेटरचा वापर करावा लागत आहे. डिझेलसाठी लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्यामुळे उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

राज्यातील महत्वाच्या औद्योगीक वसाहतीमध्ये तळोजा एमआयडीसीचा समावेश आहे. जेएनपीटी बंदर जवळ असल्यामुळे कृषी माल व इतर वस्तूंचा साठा करणारी अनेक कोल्ड स्टोरेज या परिसरामध्ये आहेत. याशिवाय इतर अनेक महत्वाचे कारखाने या परिसरात आहे. एमआयडीसीमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये विजेचा लपंडावाचाही समावेश आहे. विजपुरवठा कधी खंडीत होईल याचा काहीच भरोवसा राहिलेला नाही.सोमवारी पहाटे ७.३७ वाजता वीजपुरवठा बंद झाला तो ७.५० ला पुर्ववत झाला. रविवारी सकाळी ९ वाजता विज गेली ती २० मिनीटांनी परत आली. सायंकाळी ९ वाजता विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर पाऊसतास अंधाराचीच स्थिती होती. मागील २० दिवसामध्ये १२ वेळा अशाप्रकारे लपंडावाला सामोरे जावे लागते आहे. कधी १० ते १५ मिनीट तर कधी १ ते २ तास बत्तीगुलची स्थिती असते.

विजपुरवठा खंडीत झाला की काही कारखान्यांमधील काम पूर्णपणे बंद होते. पण कोल्डस्टोरेज सारख्या उद्योजकांना एक मिनीटही विजपुरवठा बंद ठेवून चालत नाही. कोल्डस्टोरेजमध्ये ठेवलेली फळे, भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ, मांस व इतर नाशिवंत कृषी व कृषीपुरक वस्तू योग्य तापमानामध्ये ठेवाव्या लागतात. मांस व इतर वस्तूंना उणे तापमान आवश्यक असते. यामुळे विजपुरवठा खंडीत झाला तर उच्च क्षमतेच्या जनरेटरच्या सहाय्याने कारखाने सुरू ठेवावे लागतात. यासाठी डिझेलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. लहान उद्योजकांना हजारो रुपये तर मोठ्या कोल्डस्टोरेज चालकांना लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विजेचा लपंडावा कायमस्वरूपी थांबवावा अशी मागणी उद्याेजकांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.

उत्पादनावरही परिणामविजेच्या लपंडावामुळे कोल्ड स्टोरेज चालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. इतर कारखान्यांमधील उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे. विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यानंतर कामकाज ठप्प होते व मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे विद्यूतपुरवठा सुरळीत होईल यावर लक्ष द्यावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

कोल्डस्टोरेजमधील कृषी माल योग्य तापमानामध्ये ठेवावा लागतो. विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे जनरेटरचा वापर करावा लागतो. यामुळे इंधनावर हजारो रूपयांचा खर्च होत आहे. महावितरण प्रशासनाने विजेचा लपंडाव बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.- निलिमा गणेश नाईक, संचालिका - जय रिद्दी व्हेंचर 

टॅग्स :MIDCएमआयडीसीelectricityवीज