शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही तोंड उघडलं तर अडचणीत याल"; अजित पवारांच्या टीकेला रवींद्र चव्हाणांकडून जशास तसे उत्तर
2
सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार
3
मुस्ताफिजुर रहमान बाबत निर्णय झाला, संघातून वगळण्याचे बीसीसीआयचे केकेआरला आदेश
4
सावधान! फोनचे 'ब्लूटूथ' ऑन ठेवणं पडू शकतं महागात; क्षणात बँक खातं होईल रिकामं!
5
"लग्न लावून दिलंत तर..."; मैत्रिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीची धमकी, थेट नवरीलाच पळवलं
6
७ जानेवारीला उघडणार ४५ वर्ष जुन्या कंपनीचा IPO; किती करावी लागणार गुंतवणूक, प्राईज बँड किती? जाणून घ्या
7
सोमवारी तळहातावरील गुरु पर्वतावर लावा हळदीचा टिळा; 'पुष्य नक्षत्रा'च्या मुहूर्तावर उघडेल भाग्याचे द्वार!
8
व्हिडीओ घेऊ नका...! वडिलांना घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना श्रद्धा कपूर पापाराझींवर भडकली
9
Mithun Chakraborty : "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
Nashik Municipal Election 2026 : गटबाजीच्या खेळात प्रभाग २५ मध्ये दोन ठिकाणी कमळ कोमेजले, असे का घडले?
11
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
12
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
13
Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
14
पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
15
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
16
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
17
महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स
18
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
19
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
20
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी वृक्षकत्तल?पर्यावरणप्रेमी संघटना सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:29 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे दोन हजार कोटींची प्रकल्पपूर्व कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांसाठी लाखो वृक्षांची कत्तल केली जाणार आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे दोन हजार कोटींची प्रकल्पपूर्व कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांसाठी लाखो वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रकल्पामुळे किती झाडे तोडली जाणार आहेत, याची कोणतीही नोंदणी सिडकोकडे नाही किंवा त्याचे सर्वेक्षण अर्थात वृक्षगणनाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या विषयावर पर्यावरणप्रेमी आक्रमक झाल्याने याचा फटका विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ११६0 हेक्टर जागेवर सुमारे पंधरा हजार कोटी रुपये खर्च करून ग्रीडफिल्ड पद्धतीने हे विमानतळ उभारले जाणार आहे. या विमानतळाचा चार टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. २0१९ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार प्रकल्पपूर्व सुमारे दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात जमिनीचे सपाटीकरण, उलवे नदीचे पात्र बदलणे व विमानतळाच्या मार्गात मुख्य अडथळा ठरणाºया उलवे टेकडीची उंची कमी करणे या कामांचा समावेश आहे. पुढील अठरा महिन्यांत ही कामे पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी ही जमीन जीव्हीके या मुख्य कंत्राटदाराच्या सुपूर्द केली जाणार आहे. त्याअनुषंगाने कामाला गती देण्यात आली आहे. असे असले तरी या क्षेत्रातील लाखो वृक्षांचे काहीच नियोजन केले नसल्याचे दिसून आले आहे. प्रकल्पाचे काम हाती घेण्यापूर्वी या क्षेत्रातील वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्राेपणाचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र अद्यापि सिडकोकडून वृक्षांचे सर्वेक्षण झालेच नसल्याचे समोर आले आहे. याविषयीची माहिती उपलब्ध नसल्याची कबुली सिडकोने माहितीच्या अधिकारातील उत्तरात दिली आहे.विमानतळ प्रकल्पासाठी दहा गावे स्थलांतरित होणार आहेत. या गावांत आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जुनी झाडे आहेत. ही गावे स्थलांतरित करताना या वृक्षांचे काय करणार, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. तर या विरोधात हरित लवादाकडे तक्रार करणार असल्याचेसामाजिक कार्यकर्ते संजय सुर्वे यांनी सांगितले.प्रकल्पासाठी विविध ४० परवानग्यानवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत विविध विभागाच्या जवळपास ४0 परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. विमानतळबाधित क्षेत्रातील वृक्षांचे सर्वेक्षण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पपूर्व कामांमुळे एकाही वृक्षाची हानी होणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.वृक्षांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम सुरू आहे. विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाºया वृक्षांचे कोठे पुनर्राेपण करायचे याचे नियोजन सिडकोकडून केले जात आहे. त्यासाठी कोणत्याही बाह्य प्राधिकरणाची मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही. सिडकोची त्यासाठी पर्यावरणविषयक स्वतंत्र कमिटी आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई