शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक पर्यटन स्थळाला लागले वाहतूककोंडीचे ग्रहण

By admin | Updated: March 16, 2017 03:13 IST

अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा या गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र तरीही पर्यटन क्षेत्र म्हणून सरकारकडून

अभय आपटे, रेवदंडाअलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा या गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र तरीही पर्यटन क्षेत्र म्हणून सरकारकडून या गावांचा पाहिजे तसा विकास न झाल्याने येथील पर्यटनावर त्याचा परिणाम होत आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी ही येथील गंभीर समस्या आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, आगरकोट नावाचा वैभवशाली किल्ला, रशियन पहिला प्रवासी भारतात ज्या बंदरात उतरला त्या अफसानी निकितीनचे स्मारक चौल येथे आहे. एकेकाळचे श्रीमंत बंदर म्हणूनही चौल आजही परिचित आहे. ३६० मंदिरे आणि तितकेच तलाव, पुरातन वास्तू, कृषी उत्पादने आणि राजकोटसारखा पुरातन किल्ला, नारळी पोफळीच्या डौलदार बागा, आदी निसर्गरम्य परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. अलिबाग शहरापासून सुमारे सतरा कि.मी. अंतरावर असलेल्या रेवदंडा गावाला एकच मुख्य रस्ता असून पुढे कुंडलिका खाडी आहे. १९८५ च्या सुमारास कुंडलिका खाडीवर पूल झाला आणि रोह्यासारखा औद्योगिक वसाहत असलेल्या व प्रति गोवा मानल्या गेलेल्या मुरुड-जंजिरा तालुक्याला अलिबाग जोडले गेले. मात्र अरुंद रस्त्यामुळे रेवदंडा गावात कायम वाहतूककोंडीची समस्या भेडसावते. त्यामुळे स्थानिकांबरोबरच पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.अलिबाग ते रेवदंडा रस्ता म्हणजे या भागातील जीवनवाहिनी म्हटले जाते. मुरुड-जंजिऱ्याला बारमाही पर्यटकांचा राबता असल्याने हा रस्त्यावरही कायम वर्दळ असते. मात्र आपत्काळात, अथवा अपघात घडल्यास जीवनवाहिनी ठप्प होते. काही वर्षांपूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन रस्त्या रुंदीकरणाकडे लक्ष वेधले होते. पण संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. आक्षी गावापासून ते रेवदंडा आगरकोट हा प्रवास सर्वच वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पर्यटक वाहनांसाठीही रस्ता असुरक्षित बनला आहे. खड्ड्यांचे साम्राज्य, अरुंद रस्ते, धोकादायक वळणे, सूचना फलकांचा अभाव आदींमुळे पर्यटक याठिकाणी येण्याचे टाळतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पर्यटनावरही परिणाम झाला आहे. एसटी, व्होल्वोसारख्या खासगी वाहनांतून जाणारे प्रवासीही जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, तर काही पर्यटक कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र परतीच्या प्रवासाला रोहा मार्ग निवडतात.