शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

अमृत महोत्सवी वर्षात कोकणात फुलविली २७ हेक्टरवर वनराई; वन विभागाचे अभियान

By कमलाकर कांबळे | Updated: December 27, 2023 21:00 IST

एक लाख ३४ हजार ४९० झाडांची लागवड

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वन विभागाने कोकण विभागातील २७.४५ हेक्टर जागेवर वनराई फुलविली आहे. याअंतर्गत २०२३-२४ या वर्षात एक लाख ३४ हजार ४९० झाडांची लागवड करण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

वृक्षसंवर्धन आणि वृक्ष लागवडीसाठी शासनामार्फत बेलवन, अमृतवन, पंचायतवन आणि मियावाकी वननिर्मितीचे काम हाती घेतले होते. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना वन विभागामार्फत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ‘बेलवन’ उद्यानांची निर्मिती केली आहे. बेल वृक्षाची पाने, मुळे, फळे व सालीचा उपयोग व्हावा, हा यामागचा उद्देश होता. या बेलवनातून धार्मिक स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पती अर्थात बेल, सीता अशोक, रुद्राक्ष, बोर, पळस, पारिजात, पांढरा चाफा, पांढरी कण्हेर या वृक्षांचा उपयोग होणार आहे.

अमृतवन, पंचायत वनाची निर्मितीकोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण २.६० हेक्टर क्षेत्रावर एकूण एक हजार ४० बेल व इतर वृक्षांची लागवड केली आहे. कोकण विभागातील ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील एकूण ३ हेक्टर क्षेत्रावर एकूण एक हजार २०० वृक्षांची लागवड करून अमृत वन तयार केले आहे. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १७.५० क्षेत्रावर एकूण एक हजार ७५० वृक्षांची लागवड करून पंचायत वन तयार करण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई