शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

खड्ड्यांमुळे महामार्गावर कोंडी, मार्गावरील चालकांसह प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:27 IST

संततधार सुरूच : सायन-पनवेल मार्गावरील चालकांसह प्रवाशांची गैरसोय

नवी मुंबई : शहरात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सायन - पनवेल मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा परिणाम वाहतूककोंडीवर होत असून शुक्रवारी उरणफाटा ते जुईनगरपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

पावसाळ्यात सायन-पनवेल मार्गावर पडणारे खड्डे दरवर्षी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. पाऊस पडताच मार्गावर जागोजागी डांबर उघडून मोठमोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत असून वाहतूककोंडीचीही समस्या भेडसावत आहे. शुक्रवारी पुन्हा सायन-पनवेल मार्गावर सीबीडीकडे जाणाºया लेनवर वाहतूककोंडी झाली होती. उरणफाटा येथील पुलावर तसेच लगतच्या रस्त्यावर, शिरवणे पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे सीबीडीच्या दिशेने जाणाºया वाहनांची गती मंदावल्याने जुईनगरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

दररोज सकाळ- संध्याकाळ सायन-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. ही वाहतूककोंडीची समस्या शुक्रवारी रात्रीपर्यंत कायम होती. मागील काही दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरूच असून शुक्रवारी ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक पाऊस नेरूळ विभागात पडला आहे. तर चार ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झालेली नाही. सातत्याने कोसळणाºया पावसामुळे शहरातील जनजीवनावर परिणाम होत आहे. सायन-पनवेल मार्गावर वाशी गावलगतही खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी खडी टाकण्यात आलेली आहे. परंतु खडी मार्गावर पसरली असल्याने दुचाकी घसरत आहेत.विद्युत खांब कोसळलामुसळधार पावसामुळे आग्रोळी येथील उड्डाणपुलावरील विद्युत खांब कोसळल्याची घटना घडली. तिथल्या पथदिव्याचा खांब जीर्ण झाल्याने कोसळल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र हा खांब एखाद्या भरधाव वाहनावर अथवा समोर कोसळला असता तर मोठा अपघात घडला असता. तर हा खांब कोसळल्यानंतरही बराच वेळ रस्त्यावरच पडलेला होता. यामुळे उघड्यावर पडलेल्या वीजवाहिन्यांचा धोका निर्माण झाला होता. परिवहन सदस्य समीर बागवान यांनी ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून तिथला वीज प्रवाह खंडित करण्यास कळविले तसेच जीर्ण झालेले खांब बदलण्याचीही मागणी केली.दिवसभरात ३८ मिमी पाऊसशुक्रवारी दिवसभरात शहरात ३८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी बेलापूर विभागात ४२ मिमी, नेरूळ विभागात ४५ मिमी, वाशी विभागात ३१ मिमी तर ऐरोली विभागात ३४ मिमी पाऊस कोसळला. या वेळी जोराच्या सुटलेल्या वाºयामुळे चार ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्यादेखील घटना घडल्या.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNavi Mumbaiनवी मुंबई