शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

पावसामुळे कळंबोलीत बत्ती गुल

By admin | Updated: June 14, 2017 03:15 IST

इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंबोली : इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसात कळंबोलीतील महावितरणची यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत बहुतांश भागातील वीज गायब झाली, तर मंगळवारी सकाळी तीन तास बत्ती गुल होती. त्यामुळे कळंबोलीकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सिडको वसाहतीत दिवसागणिक लोकवस्ती वाढत चालली आहे. त्याच प्रमाण वीजजोडण्यांची संख्या वाढत आहे. ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या विचार करता अनेक सुधारणा अपेक्षित असताना त्या केवळ कागदावरच आहेत. त्याचबरोबर एखाद्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला तरी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. सिडको वसाहतीत वीजगळती व थकबाकीचे प्रमाण कमी आहे. मात्र तरीही नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. बत्ती गुल होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत रहावा याकरिता महावितरणने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी उन्हाळ्यात पनवेल परिसरात दिवसभर शटडाऊन घेतला जात होता. मंगळवार तर महावितरणचा दुरूस्तीचा हक्काचा वार त्याचबरोबर मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली ग्राहकांना घामाघूम केले जात होते. मात्र त्याचा काही फायदा झाला नसल्याची प्रचिती सोमवारी कळंबोलीतील वीजग्राहकांना आली. या नोडमध्ये रात्री नऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला तो मध्यरात्री सुरळीत झाला. मंगळवारीही सकाळी साडेसहा वाजता गुल झालेली बत्ती दहा वाजता पूर्ववत झाली. यामुळे रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. यासंदर्भात सहाय्यक कार्यकारी अभियंता ए. व्ही. पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. विजेच्या प्रश्नावर सेना आक्र मकग्राहकांकडून नियमित वीज बिल भरण्याची अपेक्षा केली जाते. त्याचप्रमाणे सुरळीत व अखंडित वीजपुरवठा व्हावा मिळणे त्यांचा हक्क आहे. त्यानुसार योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली आहे, अन्यथा ग्राहकहितवर्धक भूमिका घेवून शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याची येईल असा इशारा मंगळवारी निकम यांनी दिला. या संदर्भात पक्षाच्या वतीने कळंबोली उपविभागीय कार्यालयात पत्र देण्यात आले.