शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शाखा नसल्यानेच सेनेचा विस्तार खुंटला

By admin | Updated: April 29, 2017 01:57 IST

मुंबई, ठाण्याची सातत्याने सत्ता मिळविणाऱ्या शिवसेनेची नवी मुंबईमध्ये मात्र वाताहात सुरू आहे. पक्षाची ताकद समजल्या जाणाऱ्या

नामदेव मोरे /नवी मुंबई मुंबई, ठाण्याची सातत्याने सत्ता मिळविणाऱ्या शिवसेनेची नवी मुंबईमध्ये मात्र वाताहात सुरू आहे. पक्षाची ताकद समजल्या जाणाऱ्या शाखांचे जाळे विणण्यात नेत्यांना अपयश आल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. वाशीतील मध्यवर्ती कार्यालयही अद्याप बुधाजी भोईर व राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांच्या नावावर आहे. नेरुळ, तुर्भे, ऐरोलीमधील शाखा वादग्रस्त ठरल्या असून अनेकांना टाळे लागले आहे. उर्वरित ठिकाणी सेना पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी व नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी हक्काची शाखाच नसल्याने पक्षाची वाढ खुंटली आहे. नवी मुंबईमधील शिवसेनानेते पक्षाचा विस्तार करण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंग झाले आहेत. पक्षात निष्ठावंत व उपरे असे दोन वर्ग पडले आहेत. याशिवाय प्रत्येक नेत्याने स्वत:चा वेगळा गट तयार करण्यास सुरुवात केली आहे. गटा-तटामध्ये विभागलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या मूळ रचनेचाच विसर पडला आहे. शिवसेनेमध्ये शाखा व शाखाप्रमुख यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मुंबई व ठाण्यात प्रत्येक नोडमध्ये कायमस्वरूपी शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत. शाखांचे जाळे घट्ट असल्याने व नागरिकांसह शिवसैनिकांची शाखांशी बांधीलकी असल्याने पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र केला तरी संघटना खिळखिळी होत नाही. राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतरही मुंबई व ठाण्यामधील शाखा व शाखाप्रमुखांसह निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर सत्ता टिकविण्यास व पुन्हा मिळविण्यात पक्षाने यश मिळविले; परंतु नवी मुंबईमध्ये शाखांची बांधणीच झाली नसल्याने गणेश नाईकांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर २० वर्षांमध्ये अद्याप पक्षबांधणी करण्यात पक्षाला यश आले नाही. शाखांचे जाळे नसल्यानेच नवी मुंबईमध्ये शिवसेना वाढत नाही. वाशीमध्ये पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आहे; परंतु त्याची मालकी बुधाजी भोईर व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावावर आहे. भोईर यांच्या निधनानंतर मालकी असलेले नाईक हेच असल्याने शाखा सेनेची असली तरी मालकी नाईकांचीच असल्याची स्थिती आहे. दोन दशकांमध्ये नाईकांकडून मध्यवर्ती कार्यालयाची मालकी मिळविण्यास पक्षाला अपयश आले आहे. हीच स्थिती ऐरोलीमधील शाखेची आहे. अनंत सुतार यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर तेथील शाखेच्या मालकीचा वाद निर्माण झाला आहे. हा वाद न्यायालयात असल्याने एके काळी ऐरोलीची ताकद असलेल्या या शाखेला टाळे लावण्यात आले आहेत. तुर्भे स्टोअर्समधील शाखेमध्ये तळमजल्याची मालकी शिवसेनेकडे व वरील मजल्याची मालकी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुरेश कुलकर्णी यांच्याकडे अशी स्थिती आहे. उप जिल्हाप्रमुख के. एन. म्हात्रे यांच्या पक्षांतरानंतर नेरुळ गावामधील शाखाही बंद आहेत. जुन्या शाखा वादग्रस्त ठरत असताना उर्वरित ठिकाणी शाखाच नसल्याने शिवसैनिक निवडणुकीपुरत्याच शाखा तयार करत असल्याने शाखेविषयी नागरिकांमध्ये अस्था राहिलेली नाही.