शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोयी-सुविधांअभावी कामोठेतील टपाल कार्यालयाला घरघर

By admin | Updated: March 30, 2016 01:53 IST

कामोठे वसाहतीत जवाहर इंडस्ट्रीमध्ये असलेल्या टपाल कार्यालयात सध्या अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अतिशय छोट्या जागेत

- अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोली कामोठे वसाहतीत जवाहर इंडस्ट्रीमध्ये असलेल्या टपाल कार्यालयात सध्या अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अतिशय छोट्या जागेत या टपाल कार्यालयाचे काम सुरू आहे. पुरेशा सोयी-सुविधांअभावी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी ग्राहकांना नवीन पनवेल येथील टपाल कार्यालयात जावे लागते. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली ही संदेशवहनाची यंत्रणा आजही सुरू आहे. स्वातंत्र्योत्तर काळात टपाल, तार हीच संपर्काची प्रमुख माध्यमे होती. याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविण्यासाठी मनिआॅर्डरची सुविधा होती, जी आजही प्रचलित आहे. या व्यतिरिक्त महत्त्वाची कागदपत्रे, पार्सल त्वरित पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा उपलब्ध आहे. टपाल सेवेला पर्याय म्हणून अनेक कुरियर सेवा सुरू करण्यात आल्या असल्या तरी अजूनही विश्वासार्ह सेवा म्हणून ग्रामीणबरोबरच शहरी भागातही टपाल सेवेलाच प्राधान्य दिले जाते. शासकीय पत्रव्यवहार, पार्सल, महत्त्वाची कागदपत्रे, बिल, पॅन कार्ड, वाहन परवाना, परमीट, पासपोर्ट, बँकांच्या नोटिसा किंवा माहिती पत्र, न्यायालयाच्या नोटिसा, समज, निकालपत्र हे आजही पोस्टानेच पाठवले जाते. जनतेसाठी इतक्या महत्त्वाच्या असलेल्या टपाल सेवेसाठी कामोठे वसाहतीकरिता स्वतंत्र टपाल कार्यालय नसल्याने त्याचा भार जवाहर इंडस्ट्रीजतील कार्यालयावर आहे. टपाल खात्यात पत्रांची आवक-जावक जास्त असते. दररोज जवळपास ५०० हून अधिक टपाल येतात. पत्र, मनिआॅर्डर, रजिस्टर, पार्सल, पॅन कार्ड, टपालाचे वितरण करावे लागते. मात्र कामोठेतील टपाल कार्यालयाची जागा त्यासाठी अपुरी पडते. यासाठी किमान १००० चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. पत्र, कुरिअर, स्पीडपोस्टचे पार्सल ठेवले तर कर्मचाऱ्यांना बसण्याकरिता जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेक टपालांचे वितरण थेट नवीन पनवेल येथील मुख्य कार्यालयातून केले जात आहे. पोस्टमनची संख्याही कमी असल्याने सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे अनेकदा टपाल नागरिकांना उशिरा मिळत असल्याच्या तक्र ारी येत आहेत. कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी काम करीत असून त्यांच्यावर सुध्दा कामाचा भार आहे. येथे रजिस्टर पोस्ट, बुक पोस्ट, इंटीमेशन, आरडी बचत आदी कामे होतात. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा उरक होत नाही. टपालाची कागदपत्रे रिक्षाने नवीन पनवेलला पाठवले जातात त्याकरिता पोस्टाची गाडी येत नाही. अतिशय अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयाकडे जाण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे रिक्षा करूनच जावे लागते. रस्ते अतिशय खराब असल्याने रिक्षा सुध्दा तिथे जात नाही. त्यामुळे कित्येक जण कळंबोली किंवा खांदा वसाहतीतील पोस्ट कार्यालयात जावून काम करतात.सिडको जागा देईनाकामोठेकरांची गैरसोय दूर व्हावी,याकरिता वसाहतीच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळावी याकरिता सिडकोकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र अशा कामाकरिता सिडको काही जागा देत नसल्याने टपाल विभाग सुध्दा पाठपुरावा करून थकला आहे. वास्तविक पाहता सिडकोने याकरिता राखीव जागा ठेवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मद्यपींचा अड्डाजवाहर इंडस्ट्रीजमध्ये असलेल्या पोस्ट कार्यालयात रहिवासी संकुल नाहीत. आजूबाजूला कारखाने असल्याने येथे कामगारवर्गाचा वावर जास्त आहे. त्यामुळे पोस्ट कार्यालय बंद झाल्यानंतर या ठिकाणी मद्यपी दारू पित असल्याचे आजूबाजूला पडलेल्या रिकाम्या बाटल्यावरून उघड झाले आहे.कामोठे वसाहतीत सेक्टर २0 मध्ये भाडेतत्त्वावर पर्यायी जागा घेण्यात आली आहे. त्याचा करारनामा झाला आहे. लवकरच जवाहर इंडस्ट्रीजचे कार्यालय त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल. त्याचबरोबर सिडकोकडून जागा मिळावी याकरिता पाठपुरावा केला जात आहे.- दीपाली कांबळे, पोस्ट मास्टर, कामोठेजवाहर इंडस्ट्रीजमधील पोस्ट कार्यालयाची स्थिती बिकट आहे. कॉलनीत टपाल कार्यालयासाठी सिडको आणि पोस्टाकडून समन्वय साधणे आवश्यक आहे- धनश्री चव्हाण, रहिवासी.टपाल, मनिआॅर्डर, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्रआदी महत्त्वाची कागदपत्रे टपालानेच येतात. मात्र टपालचे मुख्य कामकाज नवीन पनवेलहून होते. - दादाभाऊ चौधरी, रहिवासी