शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

उलवे टेकडीच्या खोदकामास पावसाचा व्यत्यय

By admin | Updated: July 6, 2017 06:45 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाला गेल्या महिन्यापासून सुरुवात करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाला गेल्या महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी टेकडीवर सुरुंग पेरून स्फोट घडविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु गेल्या सहा दिवसांपासून पावसाचा टेकडी उत्खननाच्या कामात व्यत्यय आला आहे. सुरुंग पेरण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने स्फोटके भरताना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रखडल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सिडकोने विमानतळपूर्व कामे हाती घेतली आहेत. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा सामावेश आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात उलवे टेकडीच्या सपाटीकरणाचे काम अत्यंत जोखमीचे व तितकेच महत्त्वाचे आहे. या टेकडीची उंची ९५ मीटर इतकी आहे. विमानतळासाठी ती ८६ मीटर इतकी कमी केली जाणार आहे. त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे. झारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अलीकडेच टेकडीवर स्फोट घडवून या कामाची चाचणी घेण्यात आली. दरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर आतापर्र्यंत २७ स्फोट घडविल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. असे असले तरी पावसामुळे या कामात व्यत्यय आला आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास १३00 सुरुंग पेरले जाणार आहेत. त्यासाठी टेकडीवर खड्डे खोदण्यात आले आहेत. परंतु त्यात पावसाचे पाणी साचल्याने स्फोटके पेरण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्फोटके पेरण्याचे काम थांबविण्यात आले आहे. मात्र पावसाची उघडीप होताच या कामाला गती दिली जाईल, असे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर कामझारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात जवळपास १३00 सुरुंग पेरले जाणार आहेत.