शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मुसळधार पावसामुळे शहरातील मुक्या प्राण्यांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:54 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून आजार वाढीस लागतात. माणसांबरोबरच मुक्या जीवांमध्येही विविध प्रकारच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून

- प्राची सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून आजार वाढीस लागतात. माणसांबरोबरच मुक्या जीवांमध्येही विविध प्रकारच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरातील ४०० हून अधिक मुक्या जीवांना प्राणीप्रेमी संस्थांकडून उपचार करण्यात आले आहेत तर १०० अधिक मुक्या जीवांना प्राण गमवावे लागले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडत आहेत आणि झाडांवर निवारा असलेले मुके जीव मात्र बेघर होत असल्याने शहरातील प्राणीपे्रमी या मुक्या जीवांना जीवनदान देण्याकरिता पुढे सरसावल्या आहेत. पावसाळ््यात पशू-पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले असून भिजल्याने तसेच डिहायड्रेशनमुळे देखील या मुक्या जीवांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याची माहिती प्राणीप्रेमी संस्थांकडून दिली जात आहे. पावसाच्या तडाख्याने झाडे पडल्याने पक्ष्यांची घरटी मोडली असून ते बेघर झाले आहेत. असे पक्षी मानवी वस्तीत आसरा घेत आहेत त्यामुळे पावसात भिजलेल्या पक्ष्यांना घराच्या खिडकीत निवारा देण्याचे आवाहन प्राणीप्रेमींनी केले आहे. पावसात भिजल्याने न्यूमोनिआचे आजार होत असल्याने या पक्ष्यांना ऊब मिळणे आवश्यक आहे त्याकरिता नागरिकांनी प्राणीप्रेमी संस्थांना मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केली आहे. पनवेल परिसरातील बऱ्याचशा भागांमध्ये गाय, बैल यांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातात गंभीर जखमी प्राण्यांना अथवा पक्ष्यांना या संस्थेच्या रुग्णालयात दाखल करून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख सागर सावला यांनी दिली. पावसाच्या फटक्याने नवी मुंबई तसेच पनवेल परिसरातील जखमी पशू-पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली असून या प्राणीप्रेमी संस्थेच्या पुढाकाराने दिवसभरात दहापेक्षा अधिक मुक्या जीवांवर उपचार केले जातात. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने नाले, तलाव भरून वाहत आहेत. त्यामुळे रस्त्यावर येणारे सरपटणारे प्राणी जखमी होत असून पावसाच्या सरींचा फटका बसून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडत आहेत. मुसळधार पावसात कुत्रे, मांजर रस्त्यावर येऊन वाहनांच्या धडकेत जखमी होत असल्याच्या घटनाही वाढत झाल्याची माहिती प्राणीप्रेमी संस्थांनी दिली आहे. वातावरणातील बदलामुळे पशू-पक्ष्यांना अशक्तपणा येत असून त्यांना टॉनिक, लसीकरण, मलमपट्टी असे औषधोपचार केले जातात.नवी मुंबईतील भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने अशा पशू-पक्ष्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला जात असून त्यांच्यावर मोफत उपचार केले जात आहेत. याठिकाणी एकाचवेळी १००० मुक्या जीवांवर उपचार केले जातात. संस्थेच्या वतीने त्वरित रुग्णवाहिका पोहोचवून तेथील जखमी मुक्या जीवांवर उपचार केले जातात. यामध्ये घार, घुबड, कबुतर, पोपट, सरपटणारे प्राणी,मांजरीची पिल्ले,कुत्रे यांचा समावेश आहे.