शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

थकीत एलबीटी वसुलीचा नगरसेवकांचा पालिकेकडे तगादा, महासभेत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:30 IST

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ३३८ कारखानदारांकडे पालिकेचे एलबीटीच्या रूपाने जवळपास ४०० कोटी थकीत आहेत. ही थकीत रक्कम कधी वसूल होणार? यासंदर्भात सोमवारी महासभेत सत्ताधारी-विरोधक नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे वसुलीचा तगादा लावला. वर्षभराचा कालावधी लोटून देखील थकीत एलबीटी वसूल होत नसल्याने सभागृहात या विषयावर चर्चा करण्यात आली.

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ३३८ कारखानदारांकडे पालिकेचे एलबीटीच्या रूपाने जवळपास ४०० कोटी थकीत आहेत. ही थकीत रक्कम कधी वसूल होणार? यासंदर्भात सोमवारी महासभेत सत्ताधारी-विरोधक नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे वसुलीचा तगादा लावला. वर्षभराचा कालावधी लोटून देखील थकीत एलबीटी वसूल होत नसल्याने सभागृहात या विषयावर चर्चा करण्यात आली.पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी थकीत एलबीटी कारखानदारांसोबत वारंवार बैठक घेऊन एलबीटी भरण्याची विनंती केली. यासंदर्भात कारखानदारांनी ही रक्कम भरण्यास विरोध दर्शविला. संबंधित कारखानदारांना नोटिसा बजावून ही थकीत रक्कम भरण्याची विनंती देखील पालिकेच्या मार्फत करण्यात आली. कारखानदारांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याने ही वसुली लांबणीवर पडली आहे. यासंदर्भात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. या वसुलीचे काय झाले? पालिकेच्या मार्फत योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा नगरसेवक नितीन पाटील यांनी देखील एलबीटी वसुलीसंदर्भात सेलटॅक्स दर्जाचा अधिकारी नेमणे गरजेचे असताना अद्याप किती अधिकारी याकरिता नेमले आहेत? ही रक्कम वसुलीसंदर्भात काही अधिकारी सेटिंग करीत असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला. यावर आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी उत्तर देताना सांगितले की, असे प्रकार सुरू असतील तर त्याची ठोस माहिती माझ्याकडे द्या. यासंदर्भात चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच आयुक्तांनी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना यासंदर्भात उत्तर देण्यास सभागृहात बोलावले. लेंगरेकर यांनी अद्याप एक अधिकारी या कामासाठी पालिकेत रुजू झाला आहे, उर्वरित अधिकाºयांच्या नेमणुकीसाठी जाहिरात काढण्यात आली असल्याचे सांगितले.यासंदर्भात नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी एलबीटी व जीएसटीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करणार असल्याचे सभागृहात सांगितले. एलबीटी भरण्यास कारखानदार दिरंगाई करीत असतील तर त्यांचे कारखाने बंद पाडण्याचा अधिकार पालिकेला आहे, तेव्हाच कारखानदार वठणीवर येतील, अशी प्रतिक्रि या नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी दिली. ही रक्कम पालिकेकडे जमा झाल्यास पनवेलच्या विकासाला गती प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :panvelपनवेल