शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

पाण्याअभावी उड्डाणपुलावरील झाडे सुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:19 IST

लाखो रु पयांचे नुकसान: कुंड्यातील रोपेही झाली गायब; प्रशासनाचे दुर्लक्ष

पनवेल : नवीन पनवेल ते खांदा वसाहत शहराला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यासाठी सिडकोने लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे तासनतास रेल्वेच्या बंद फाटकाजवळ थांबणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला. वाहतूककोंडी देखील कमी झाली. मात्र या उड्डाणपुलावरील दुभाजकावर लावलेल्या झाडांकडे सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. या पुलावरील सर्व झाडे सुकली आहेत, तर कुंड्यामधील रोपेसुद्धा गायब झाल्याचे दिसून आले आहे.

नवीन पनवेल ते खांदा वसाहतीला जोडणाºया उड्डाणपुलावर सिडकोने काही वर्षांपूर्वी झाडे लावली होती. त्यासाठी एका ठेकेदाराला ठेका दिला होता, मात्र त्या ठेकेदाराने झाडांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे झाडे उन्हात करपून मेली आहेत. काही झाडांना पाणी न घातल्यामुळे येथील झाडे सुकून गेली आहेत. त्यामुळे सिडकोचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यानंतर सिडकोने पुन्हा या उड्डाणपुलावर कुंड्यात रोपे लावली आहेत. त्यासाठी लाखो रु पये या झाडांवर खर्च केले आहेत. मात्र यापूर्वीची लावलेली झाडे जगवता आली नाहीत तर या कुंड्यातील झाडे कशी जगतील, असा सवाल रहिवाशांकडून होत आहे.

उड्डाणपुलावर झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून हे फलक सुध्दा गायब झाले आहेत. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या दुभाजकावर लावलेल्या कुंड्यांमधील रोपट्यांसह मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत तर कही करपून गेली आहेत. वेळोवेळी काळजी न घेतली गेल्याने ही झाडे सुकून गेली आहेत. असे असतानाही पुन्हा लाखो रुपये खर्च करून नवीन झाडे लावली जात असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.