शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

जलकुंभ नियोजनाअभावी कोरडे

By admin | Updated: August 28, 2014 04:49 IST

कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या पाणी योजना राबवण्यात आल्या़

कोळसेवाडी : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या पाणी योजना राबवण्यात आल्या़ परंतु प्रशासनातील दिरंगाई व नियोजनाच्या अभावी शेकडो ठिकाणच्या पाणी जोडण्यामधून दैनंदिन हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. तर बांधलेले जलकुंभ पाणी वितरण व्यवस्थेच्या नियोजनाअभावी गेली काही वर्षे कोरडेच राहिले आहेत.कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी माहिती दिली ती अशी की, मनपाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उल्हास नदीवरील मोहोने बंधाऱ्यामधून मोहोने उदंचन केंद्रावर १४७ दश लक्ष लिटर प्रतिदिन अशुद्ध पाणी उचलून बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते कल्याण पूर्व व पश्चिम असे वितरीत केले जाते. तसेच उल्हास नदीवरील मोहिली उदंचन केंद्राद्वारे १०० द.ल.ली. पाणी प्रतिदिन उचलून नेतीवली केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते डोंबिवली पूर्व व पश्चिम असे वितरीत केले जाते. तसेच मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून ६० द.ल.लि. प्रतिदिन पाणीशुद्ध करून कल्याण ग्रामीणमधील मांडा, वडवली, जेतवननगर इत्यादी कल्याण पश्चिमेतील भागांना पुरवले जाते. काळू नदीवरील टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून प्रतिदिनी ४.०० द.ल.ली. पाणीशुद्ध करून टिटवाळा गाव परिसरात पुरवले जाते. बारावे, नेतीवली, मोहिली व टिटवाळा केंद्रातून एकूण ३१० द.ल.ली. प्रतिदिन पाणीशुद्ध करून विविध जलकुंभातून वाहिन्यांद्वारे वितरीत केले जाते.यंदा पाऊस लांबला होता, परंतु, अल्पावधीत तो चांगला झाल्याने सध्या पाणीपुरवठा चांगला आहे, मात्र, टंचाईग्रस्त कल्याण पूर्व भागात खडे-गोळवली, कैलासनगर, चिंचपाडा, तिसगाव, या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो.‘ड’ प्रभागातील जलकुंभ आणि कुपनलिकांची माहिती उपअभियंता दिलीप खरे यांनी दिली ती अशी की, तळटाक्या धरून १२ जलकुंभ आहेत, तर कूपनलिका एकूण २१६ असून सद्यस्थितीत १६८ सुरू आहेत, सहा कूपनलिकांचे दुरुस्ती प्रस्ताव आहेत, तर ४२ कायम स्वरुपी बंद आहेत.कल्याण-डोंबिवलीत कूपनलिकांची एकूण संख्या ८७२ असून ६२९ कूपनलिका सुरू आहेत, ८० कूपनलिका बंद आहेत, तर १६० कूपनलिका कायमस्वरुपी बंद असल्याची तसेच श्रद्धा बोअरवेल या कंपनीला दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले असून प्रत्येकी दुरुस्तीसाठी ४५७ रुपये खर्च होणार असल्याची माहिती जून १४च्या स्थायी समितीमध्ये देण्यात आली आहे.या कूपनलिकांप्रमाणे कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या विहिरींच्या स्वच्छतेसाठी काही लाखांची तरतूद केली जाते, मात्र, त्यातील किती विहिरींची मनपातर्फे स्वच्छता होते, हा संशोधनाचा विषय आहे. कल्याण-डोंबिवलीत ५० ते ६० पडक्या अवस्थेतील विहिरी आहेत, जगतापवाडी, कोळसेवाडी भागातील विहिरी बंदिस्त करण्यात आल्या असून त्यांची स्वच्छता व निगा राखली जात असल्याचे समजते, काही विहिरींना मोटारलावून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरले जाते, परंतु, मनपा प्रशासनाकडे विहिरींचे योग्य ते सर्वेक्षण न होत असल्यामुळे आकडेवारी उपलब्ध नाही.या मनपा क्षेत्रात २० हजार बेकायदा नळ जोडण्यांमुळे दरवर्षी मनपाला ५० ते ६० कोटींचा फटका बसत असून, मनपाचे सर्व संबंधित अधिकाऱ्याच्या सहकार्याने हे होत असल्याचा गंभीर आरोप एका ज्येष्ठ सदस्याने केला.