शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

जलकुंभ नियोजनाअभावी कोरडे

By admin | Updated: August 28, 2014 04:49 IST

कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या पाणी योजना राबवण्यात आल्या़

कोळसेवाडी : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या पाणी योजना राबवण्यात आल्या़ परंतु प्रशासनातील दिरंगाई व नियोजनाच्या अभावी शेकडो ठिकाणच्या पाणी जोडण्यामधून दैनंदिन हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. तर बांधलेले जलकुंभ पाणी वितरण व्यवस्थेच्या नियोजनाअभावी गेली काही वर्षे कोरडेच राहिले आहेत.कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी माहिती दिली ती अशी की, मनपाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उल्हास नदीवरील मोहोने बंधाऱ्यामधून मोहोने उदंचन केंद्रावर १४७ दश लक्ष लिटर प्रतिदिन अशुद्ध पाणी उचलून बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते कल्याण पूर्व व पश्चिम असे वितरीत केले जाते. तसेच उल्हास नदीवरील मोहिली उदंचन केंद्राद्वारे १०० द.ल.ली. पाणी प्रतिदिन उचलून नेतीवली केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते डोंबिवली पूर्व व पश्चिम असे वितरीत केले जाते. तसेच मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून ६० द.ल.लि. प्रतिदिन पाणीशुद्ध करून कल्याण ग्रामीणमधील मांडा, वडवली, जेतवननगर इत्यादी कल्याण पश्चिमेतील भागांना पुरवले जाते. काळू नदीवरील टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून प्रतिदिनी ४.०० द.ल.ली. पाणीशुद्ध करून टिटवाळा गाव परिसरात पुरवले जाते. बारावे, नेतीवली, मोहिली व टिटवाळा केंद्रातून एकूण ३१० द.ल.ली. प्रतिदिन पाणीशुद्ध करून विविध जलकुंभातून वाहिन्यांद्वारे वितरीत केले जाते.यंदा पाऊस लांबला होता, परंतु, अल्पावधीत तो चांगला झाल्याने सध्या पाणीपुरवठा चांगला आहे, मात्र, टंचाईग्रस्त कल्याण पूर्व भागात खडे-गोळवली, कैलासनगर, चिंचपाडा, तिसगाव, या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो.‘ड’ प्रभागातील जलकुंभ आणि कुपनलिकांची माहिती उपअभियंता दिलीप खरे यांनी दिली ती अशी की, तळटाक्या धरून १२ जलकुंभ आहेत, तर कूपनलिका एकूण २१६ असून सद्यस्थितीत १६८ सुरू आहेत, सहा कूपनलिकांचे दुरुस्ती प्रस्ताव आहेत, तर ४२ कायम स्वरुपी बंद आहेत.कल्याण-डोंबिवलीत कूपनलिकांची एकूण संख्या ८७२ असून ६२९ कूपनलिका सुरू आहेत, ८० कूपनलिका बंद आहेत, तर १६० कूपनलिका कायमस्वरुपी बंद असल्याची तसेच श्रद्धा बोअरवेल या कंपनीला दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले असून प्रत्येकी दुरुस्तीसाठी ४५७ रुपये खर्च होणार असल्याची माहिती जून १४च्या स्थायी समितीमध्ये देण्यात आली आहे.या कूपनलिकांप्रमाणे कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या विहिरींच्या स्वच्छतेसाठी काही लाखांची तरतूद केली जाते, मात्र, त्यातील किती विहिरींची मनपातर्फे स्वच्छता होते, हा संशोधनाचा विषय आहे. कल्याण-डोंबिवलीत ५० ते ६० पडक्या अवस्थेतील विहिरी आहेत, जगतापवाडी, कोळसेवाडी भागातील विहिरी बंदिस्त करण्यात आल्या असून त्यांची स्वच्छता व निगा राखली जात असल्याचे समजते, काही विहिरींना मोटारलावून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरले जाते, परंतु, मनपा प्रशासनाकडे विहिरींचे योग्य ते सर्वेक्षण न होत असल्यामुळे आकडेवारी उपलब्ध नाही.या मनपा क्षेत्रात २० हजार बेकायदा नळ जोडण्यांमुळे दरवर्षी मनपाला ५० ते ६० कोटींचा फटका बसत असून, मनपाचे सर्व संबंधित अधिकाऱ्याच्या सहकार्याने हे होत असल्याचा गंभीर आरोप एका ज्येष्ठ सदस्याने केला.