शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

जलकुंभ नियोजनाअभावी कोरडे

By admin | Updated: August 28, 2014 04:49 IST

कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या पाणी योजना राबवण्यात आल्या़

कोळसेवाडी : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ गेल्या काही वर्षांत कोट्यवधींच्या पाणी योजना राबवण्यात आल्या़ परंतु प्रशासनातील दिरंगाई व नियोजनाच्या अभावी शेकडो ठिकाणच्या पाणी जोडण्यामधून दैनंदिन हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. तर बांधलेले जलकुंभ पाणी वितरण व्यवस्थेच्या नियोजनाअभावी गेली काही वर्षे कोरडेच राहिले आहेत.कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी माहिती दिली ती अशी की, मनपाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उल्हास नदीवरील मोहोने बंधाऱ्यामधून मोहोने उदंचन केंद्रावर १४७ दश लक्ष लिटर प्रतिदिन अशुद्ध पाणी उचलून बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते कल्याण पूर्व व पश्चिम असे वितरीत केले जाते. तसेच उल्हास नदीवरील मोहिली उदंचन केंद्राद्वारे १०० द.ल.ली. पाणी प्रतिदिन उचलून नेतीवली केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते डोंबिवली पूर्व व पश्चिम असे वितरीत केले जाते. तसेच मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून ६० द.ल.लि. प्रतिदिन पाणीशुद्ध करून कल्याण ग्रामीणमधील मांडा, वडवली, जेतवननगर इत्यादी कल्याण पश्चिमेतील भागांना पुरवले जाते. काळू नदीवरील टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून प्रतिदिनी ४.०० द.ल.ली. पाणीशुद्ध करून टिटवाळा गाव परिसरात पुरवले जाते. बारावे, नेतीवली, मोहिली व टिटवाळा केंद्रातून एकूण ३१० द.ल.ली. प्रतिदिन पाणीशुद्ध करून विविध जलकुंभातून वाहिन्यांद्वारे वितरीत केले जाते.यंदा पाऊस लांबला होता, परंतु, अल्पावधीत तो चांगला झाल्याने सध्या पाणीपुरवठा चांगला आहे, मात्र, टंचाईग्रस्त कल्याण पूर्व भागात खडे-गोळवली, कैलासनगर, चिंचपाडा, तिसगाव, या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो.‘ड’ प्रभागातील जलकुंभ आणि कुपनलिकांची माहिती उपअभियंता दिलीप खरे यांनी दिली ती अशी की, तळटाक्या धरून १२ जलकुंभ आहेत, तर कूपनलिका एकूण २१६ असून सद्यस्थितीत १६८ सुरू आहेत, सहा कूपनलिकांचे दुरुस्ती प्रस्ताव आहेत, तर ४२ कायम स्वरुपी बंद आहेत.कल्याण-डोंबिवलीत कूपनलिकांची एकूण संख्या ८७२ असून ६२९ कूपनलिका सुरू आहेत, ८० कूपनलिका बंद आहेत, तर १६० कूपनलिका कायमस्वरुपी बंद असल्याची तसेच श्रद्धा बोअरवेल या कंपनीला दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले असून प्रत्येकी दुरुस्तीसाठी ४५७ रुपये खर्च होणार असल्याची माहिती जून १४च्या स्थायी समितीमध्ये देण्यात आली आहे.या कूपनलिकांप्रमाणे कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या विहिरींच्या स्वच्छतेसाठी काही लाखांची तरतूद केली जाते, मात्र, त्यातील किती विहिरींची मनपातर्फे स्वच्छता होते, हा संशोधनाचा विषय आहे. कल्याण-डोंबिवलीत ५० ते ६० पडक्या अवस्थेतील विहिरी आहेत, जगतापवाडी, कोळसेवाडी भागातील विहिरी बंदिस्त करण्यात आल्या असून त्यांची स्वच्छता व निगा राखली जात असल्याचे समजते, काही विहिरींना मोटारलावून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरले जाते, परंतु, मनपा प्रशासनाकडे विहिरींचे योग्य ते सर्वेक्षण न होत असल्यामुळे आकडेवारी उपलब्ध नाही.या मनपा क्षेत्रात २० हजार बेकायदा नळ जोडण्यांमुळे दरवर्षी मनपाला ५० ते ६० कोटींचा फटका बसत असून, मनपाचे सर्व संबंधित अधिकाऱ्याच्या सहकार्याने हे होत असल्याचा गंभीर आरोप एका ज्येष्ठ सदस्याने केला.