शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरडी धुळवड !

By admin | Updated: March 23, 2016 02:27 IST

राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता यंदा रंगपंचमी पाणी वाया न घालविता साजरी करणे आवश्यक आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या

प्राची सोनवणे, नवी मुंबईराज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता यंदा रंगपंचमी पाणी वाया न घालविता साजरी करणे आवश्यक आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणीबचतीचा संदेश पोहोचविला जात असून, मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. महानगरपालिकेकडून पाणीपुरवठ्यामध्ये साधारणत: ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीकपात करण्यात आलेली असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण क्षेत्रामध्येही यावर्षी कमी पाऊस झाला असल्याने त्यांच्यामार्फतही मोठ्या प्रमाणात पाणीकपात करण्यात आलेली आहे. होळीच्या दिवशी म्हणजेच २३, २४ मार्चला दैनंदिन नियमित पाणीपुरवठ्याव्यातिरिक्त कोणताही अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. रंगोत्सव साजरा करताना पाण्याचा अपव्यय आणि अनावश्यक वापर टाळावा, तसेच काळजीपूर्वक पाण्याची बचत करून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे. रंगोत्सवासाठी पाण्याचे फुगे तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या विकणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. प्लास्टिक पिशव्या विकणारा विक्रेता आढळल्यास त्या दुकानदाराकडून दंडवसुली करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रंगांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रंगपंचमीला पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवून निसर्गाचा हिरवा रंग परत आणला पाहिजे. प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याची शपथ घेऊन ग्रीन सिटीसाठी हातभार लावला पाहिजे.- सुनील नाईक, अध्यक्ष, निसर्गप्रेमी फाउंडेशन