शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दारूच्या नशेत पोलिसांनाच लावले कामाला, अपघातामुळे रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 9, 2024 13:26 IST

तपासादरम्यान संबंधिताने एका अपघात केला असून त्यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला होता. 

नवी मुंबई : स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसांच्या तपासात पोलिसांना असा प्रकार घडलाच नसल्याचे समोर आले. तपासादरम्यान संबंधिताने एका अपघात केला असून त्यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला होता. 

तुर्भे परिसरात राहणाऱ्या अनिल चौहान (४०) याने अज्ञात चौघांनी त्याला मारहाण करून मोटरसायकल व रोकड लुटून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. शिवाय त्यांनी आपले अपहरण करून काही अंतरावर सोडून दिल्याचेही त्याने सांगितले होते. त्यावरून तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, वसीम शेख आदींचे पथक केले होते. त्यांनी चौहान याच्या तक्रारीवरून घटनास्थळ व संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये कुठेही त्याच्या अपहरणाचा प्रयत्न दिसून आला नाही.

मात्र एका ठिकाणी चौहान याचीच मोटरसायकल दोघा पादचाऱ्यांना धडकताना दिसून आली. त्यामुळे पादचाऱ्यांनी त्याचे अपहरण केले होते का ? याचा शोध घेण्यासाठी पोलिस त यांच्यापर्यंत पोहचले असता अपघातामध्ये जखमी व्यक्ती गावी गेल्याचे समोर आले. यामुळे चौहान याच्यावरच पोलिसांचा संशय बळावल्याने त्याच्याकडे उलट चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने आपण दारूच्या नशेत मोटरसायकल चालवत असताना दोघांना धडक दिल्याचे सांगितले. मात्र त्यामध्ये ते जखमी झाल्याने आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीमुळे त्याने आपले अपहरण करून अज्ञातांनी मोटरसायकल चोरून नेल्याची खोटी तक्रार पोलिसांकडे केल्याचे मान्य केले. याप्रकरणी चौधरी याच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.