शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

दारूच्या नशेत पोलिसांनाच लावले कामाला, अपघातामुळे रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 9, 2024 13:26 IST

तपासादरम्यान संबंधिताने एका अपघात केला असून त्यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला होता. 

नवी मुंबई : स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसांच्या तपासात पोलिसांना असा प्रकार घडलाच नसल्याचे समोर आले. तपासादरम्यान संबंधिताने एका अपघात केला असून त्यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला होता. 

तुर्भे परिसरात राहणाऱ्या अनिल चौहान (४०) याने अज्ञात चौघांनी त्याला मारहाण करून मोटरसायकल व रोकड लुटून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. शिवाय त्यांनी आपले अपहरण करून काही अंतरावर सोडून दिल्याचेही त्याने सांगितले होते. त्यावरून तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, वसीम शेख आदींचे पथक केले होते. त्यांनी चौहान याच्या तक्रारीवरून घटनास्थळ व संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये कुठेही त्याच्या अपहरणाचा प्रयत्न दिसून आला नाही.

मात्र एका ठिकाणी चौहान याचीच मोटरसायकल दोघा पादचाऱ्यांना धडकताना दिसून आली. त्यामुळे पादचाऱ्यांनी त्याचे अपहरण केले होते का ? याचा शोध घेण्यासाठी पोलिस त यांच्यापर्यंत पोहचले असता अपघातामध्ये जखमी व्यक्ती गावी गेल्याचे समोर आले. यामुळे चौहान याच्यावरच पोलिसांचा संशय बळावल्याने त्याच्याकडे उलट चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने आपण दारूच्या नशेत मोटरसायकल चालवत असताना दोघांना धडक दिल्याचे सांगितले. मात्र त्यामध्ये ते जखमी झाल्याने आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीमुळे त्याने आपले अपहरण करून अज्ञातांनी मोटरसायकल चोरून नेल्याची खोटी तक्रार पोलिसांकडे केल्याचे मान्य केले. याप्रकरणी चौधरी याच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.