शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

दारूच्या नशेत पोलिसांनाच लावले कामाला, अपघातामुळे रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 9, 2024 13:26 IST

तपासादरम्यान संबंधिताने एका अपघात केला असून त्यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला होता. 

नवी मुंबई : स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसांच्या तपासात पोलिसांना असा प्रकार घडलाच नसल्याचे समोर आले. तपासादरम्यान संबंधिताने एका अपघात केला असून त्यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला होता. 

तुर्भे परिसरात राहणाऱ्या अनिल चौहान (४०) याने अज्ञात चौघांनी त्याला मारहाण करून मोटरसायकल व रोकड लुटून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. शिवाय त्यांनी आपले अपहरण करून काही अंतरावर सोडून दिल्याचेही त्याने सांगितले होते. त्यावरून तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, वसीम शेख आदींचे पथक केले होते. त्यांनी चौहान याच्या तक्रारीवरून घटनास्थळ व संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये कुठेही त्याच्या अपहरणाचा प्रयत्न दिसून आला नाही.

मात्र एका ठिकाणी चौहान याचीच मोटरसायकल दोघा पादचाऱ्यांना धडकताना दिसून आली. त्यामुळे पादचाऱ्यांनी त्याचे अपहरण केले होते का ? याचा शोध घेण्यासाठी पोलिस त यांच्यापर्यंत पोहचले असता अपघातामध्ये जखमी व्यक्ती गावी गेल्याचे समोर आले. यामुळे चौहान याच्यावरच पोलिसांचा संशय बळावल्याने त्याच्याकडे उलट चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने आपण दारूच्या नशेत मोटरसायकल चालवत असताना दोघांना धडक दिल्याचे सांगितले. मात्र त्यामध्ये ते जखमी झाल्याने आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीमुळे त्याने आपले अपहरण करून अज्ञातांनी मोटरसायकल चोरून नेल्याची खोटी तक्रार पोलिसांकडे केल्याचे मान्य केले. याप्रकरणी चौधरी याच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.