शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

राज्यात दुष्काळ, नवी मुंबईत मात्र पाण्याचा सुकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:33 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणी वापराबाबत जनजागृतीचा अभाव; उपाययोजनांअभावी हजारो लीटर पाणी जातेय वाहून

योगेश पिंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सुरू असताना नवी मुंबई शहरात मात्र पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. शहरात सुरू असलेली बांधकामे, वाहने धुणे, सोसायट्यांमधील बाग-बगिचे, सोसायटीचे आवर पाण्याने धुऊन स्वच्छ करणे आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी केली जात आहे. या वर्षी पाणी वापराबाबत महापालिकेच्या माध्यमातूनही जनजागृतीचा केली जात नसून पाण्याच्या होणाऱ्या नासाडीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत, तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई सुरू असून त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागाला टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणात मात्र पाण्याचा मुबलक साठा असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडीही होत आहे. मुबलक पाणीसाठा असलेल्या शहराशेजारील पनवेल महापालिका हद्दीमध्येही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, आदिवासी पाड्यांमधील भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नवी मुंबई शहरात दरवर्षी पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते; परंतु यावर्षी राज्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही शहरातील नागरिकांमध्ये जनजागृतीचा आभाव आहे. अवघ्या ५० रु पयांत ३० हजार लीटर पाणीवाटप करणाºया नवी मुंबई शहरातील शहरातील गाव-गावठाण, झोपडपट्टी, सिडको आणि खासगी वसाहतींमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात असून दररोज हजारो लीटर पाणी वाया घालविले जात आहे. शहरातील हॉटेल्समध्येही आवाराची स्वच्छता करण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली जात आहे. शहरात सुरू असलेली बांधकामे, वाहनांची व सोसायट्यांच्या आवाराची स्वच्छता, सोसायट्यांमधील बाग-बगिच्यांना पाणी, पाणीगळती आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असून याकडेदेखील महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने शहरात सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली आहे.

या शौचालयांमध्ये पाण्याची सोय करण्याच्या अनुषंगाने टाक्या बसविण्यात आल्या आहेत; परंतु पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरल्यावर पाणी बंद करण्याची सुविधा आणि यंत्रणा नसल्याने अनेक टाक्या ओव्हर फ्लो होऊन पाण्याची नासाडी होत आहे, तसेच अनेक खासगी सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होत असून, पाण्याची नासाडी होत आहे. शहरात पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

मोरबेच्या पाण्याचा तपशीलनवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घन मीटर असून, दररोज ३८० ते ३९० एमएलडी पाण्याची शहराला गरज आहे.गेल्यावर्षी पावसाळ्यात पूर्णपणे भरलेल्या मोरबे धरणात ७४.६६ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा शिल्लक असून, शिल्लक पाणीसाठा नवी मुंबई शहराला सुमारे १२ सप्टेंबरपर्यंत पुरणार आहे.