शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कर्नाळा अभयारण्यात दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:19 IST

तलावातील पाण्याची पातळी खालावली : पाण्यासाठी पक्ष्यांची भटकंती, वनविभागाकडून उपाययोजना

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाळा अभयारण्यात आतापासूनच दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. येथील तलावाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे वनविभागाने अभयारण्यातील पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवल्या आहेत.

या अभयारण्यात रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बिहरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल आदी १३४ पक्ष्यांच्या स्थानिक प्रजाती आहेत. तर स्थलांतरीत झालेल्या पक्ष्यांच्या ३८ प्रजाती आहेत. सध्या वातावरणात उष्मा वाढला आहे. उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे, त्यामुळे तहान भागविण्यासाठी येथील पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. या अभयारण्यात पक्षी व वन्य प्राण्यांसाठी तीन तलाव निर्माण करण्यात आले आहेत.

या तलावाच्या पाण्यावर येथील वन्यजीव आपली तहान भागवितात; परंतु गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने सध्या या तलावांची पातळी खालावली आहे. पुढील काही दिवसांत हे तिन्ही तलाव निर्जल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील वन्यजीवांची पाण्याअभावी होरपळ होणार आहे. त्यामुळे वनविभागाने वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणी पाण्याच्या २७ कुंड्या ठेवल्या आहेत.या कुंड्या ५० ते ६० लीटर क्षमतेच्या आहेत, त्याकरिता चार बीट नेमण्यात आले आहेत. एका बीटमध्ये पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दर १५ दिवसांनी हे कर्मचारी या कुंडीतील पाण्याचा आढावा घेतात. एकूणच अभयारण्यातील पक्षी व प्राण्यांची पाण्याअभावी परवड होऊ नये, या दृष्टीने उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.