शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

कर्नाळा अभयारण्यात दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:19 IST

तलावातील पाण्याची पातळी खालावली : पाण्यासाठी पक्ष्यांची भटकंती, वनविभागाकडून उपाययोजना

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाळा अभयारण्यात आतापासूनच दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. येथील तलावाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे वनविभागाने अभयारण्यातील पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवल्या आहेत.

या अभयारण्यात रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बिहरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल आदी १३४ पक्ष्यांच्या स्थानिक प्रजाती आहेत. तर स्थलांतरीत झालेल्या पक्ष्यांच्या ३८ प्रजाती आहेत. सध्या वातावरणात उष्मा वाढला आहे. उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे, त्यामुळे तहान भागविण्यासाठी येथील पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. या अभयारण्यात पक्षी व वन्य प्राण्यांसाठी तीन तलाव निर्माण करण्यात आले आहेत.

या तलावाच्या पाण्यावर येथील वन्यजीव आपली तहान भागवितात; परंतु गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने सध्या या तलावांची पातळी खालावली आहे. पुढील काही दिवसांत हे तिन्ही तलाव निर्जल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील वन्यजीवांची पाण्याअभावी होरपळ होणार आहे. त्यामुळे वनविभागाने वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणी पाण्याच्या २७ कुंड्या ठेवल्या आहेत.या कुंड्या ५० ते ६० लीटर क्षमतेच्या आहेत, त्याकरिता चार बीट नेमण्यात आले आहेत. एका बीटमध्ये पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दर १५ दिवसांनी हे कर्मचारी या कुंडीतील पाण्याचा आढावा घेतात. एकूणच अभयारण्यातील पक्षी व प्राण्यांची पाण्याअभावी परवड होऊ नये, या दृष्टीने उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.