शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

कर्नाळा अभयारण्यात दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:19 IST

तलावातील पाण्याची पातळी खालावली : पाण्यासाठी पक्ष्यांची भटकंती, वनविभागाकडून उपाययोजना

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाळा अभयारण्यात आतापासूनच दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. येथील तलावाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे वनविभागाने अभयारण्यातील पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवल्या आहेत.

या अभयारण्यात रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बिहरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल आदी १३४ पक्ष्यांच्या स्थानिक प्रजाती आहेत. तर स्थलांतरीत झालेल्या पक्ष्यांच्या ३८ प्रजाती आहेत. सध्या वातावरणात उष्मा वाढला आहे. उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे, त्यामुळे तहान भागविण्यासाठी येथील पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. या अभयारण्यात पक्षी व वन्य प्राण्यांसाठी तीन तलाव निर्माण करण्यात आले आहेत.

या तलावाच्या पाण्यावर येथील वन्यजीव आपली तहान भागवितात; परंतु गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने सध्या या तलावांची पातळी खालावली आहे. पुढील काही दिवसांत हे तिन्ही तलाव निर्जल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील वन्यजीवांची पाण्याअभावी होरपळ होणार आहे. त्यामुळे वनविभागाने वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणी पाण्याच्या २७ कुंड्या ठेवल्या आहेत.या कुंड्या ५० ते ६० लीटर क्षमतेच्या आहेत, त्याकरिता चार बीट नेमण्यात आले आहेत. एका बीटमध्ये पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दर १५ दिवसांनी हे कर्मचारी या कुंडीतील पाण्याचा आढावा घेतात. एकूणच अभयारण्यातील पक्षी व प्राण्यांची पाण्याअभावी परवड होऊ नये, या दृष्टीने उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.