शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गावांच्या विकासाचे स्वप्न साकारणार

By admin | Updated: May 11, 2016 02:22 IST

शहरातील प्रकल्पग्रस्तांनी १९७० सालापासून बांधलेल्या घरांना नियमित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली

नवी मुंबई : शहरातील प्रकल्पग्रस्तांनी १९७० सालापासून बांधलेल्या घरांना नियमित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने त्यांच्या वतीने सोमवारी वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या प्रसंगी बोलताना शहरातील गावठाण परिसराचा विकास करून ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे ध्येय असल्याची प्रतिक्रिया मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. खारी कळवा बेलापूर विभाग शेतकरी समाज संघटना आणि एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती यांच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभाप्रसंगी प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. वाढत्या कुटुंबाची गरज म्हणून शहरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गरजेपोटी घरे बांधली असून ती नियमित करण्यात यावी, याकरिता प्रकल्पग्रस्तांनी गेली २० वर्षे आंदोलने केली, लढा दिला तरीदेखील हा प्रश्न कायम होता. त्यानंतर २००४ सालापासून आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वत: याकडे लक्ष देऊन वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण श्रेय आमदार मंदा म्हात्रे यांना जाते आणि त्यासाठीच त्यांच्या कार्याचा हा गौरव करणाऱ्या सोहळ््याचे आयोजन केल्याची प्रतिक्रिया उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. सत्कार सोहळ््याला खारी कळवा बेलापूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर पाटील, प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक एम. के. मढवी, नगरसेवक किशोर पाटकर, भाजपाचे नेते रामचंद्र घरत, रमाकांत म्हात्रे, प्रकल्पग्रस्त महिला आघाडीच्या जयश्री पाटील, अ‍ॅड. पी. सी. पाटील, बाळाराम पाटील, राजेश पाटील, नगरसेवक दीपक पवार, सरोज पाटील, शहरातील प्रकल्पग्रस्त संघटनांचे सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>प्रकल्पग्रस्तांकडे सिडकोचे दुर्लक्ष नियमानुसार गावठाण भागाची सीमा आखणे, नवी मुंबईतील गाव-गावठाण परिसरांचा विकास करणे, प्रत्येक गावाचे नियोजन करणे आदी जबाबदारी सिडकोने पार पाडलीच नाही. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या नेमक्या काय आहेत, हे जाणून घेण्यात सिडको अयशस्वी ठरली असून, आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने लढा देऊन अनेक समस्या सोडविल्याची प्रतिक्रिया राजेश पाटील यांनी व्यक्त केली.>