शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

चौगुलेंसह सहकाऱ्यांना सर्व पदे द्यायची का?

By admin | Updated: April 25, 2017 01:27 IST

विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंसह त्यांच्याच समर्थकांना सर्व पदे द्यायची का, असा प्रश्न शिवसेनेतील नाराज नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई : विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंसह त्यांच्याच समर्थकांना सर्व पदे द्यायची का, असा प्रश्न शिवसेनेतील नाराज नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. स्थायी समितीवर निष्ठावंत व नवीन नगरसेवकांनाच संधी दिली जावी, अशी आग्रही भूमिका घेतली असून त्याविषयी म्हणणे पक्षश्रेष्ठींकडे मांडले आहे. स्थायी समितीवर सदस्य निवडीवरून शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. पक्षाच्या जवळपास २० नगरसेवकांनी बेलापूर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांची भेट घेवून निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना स्थायी समितीवर पाठविण्यात येत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. २००७ मध्ये स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौगुले यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या. सेनेच्या मदतीने दुसऱ्यांदा सभापतीपद मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या विरोधात बंडखोरी करून अनंत सुतार यांच्यासह ८ जणांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला व ते स्वप्न अपुरे राहिले. चौगुले यांना यापूर्वी पक्षाने ठाणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. विधानसभेची दोन वेळा उमेदवारी दिली. पक्षाने जिल्हा प्रमुखपद दिले. जिल्हा प्रमुखपदावरून कमी केल्यानंतर अडीच वर्षे जिल्हा प्रमुखपद रिक्त ठेवण्यात आले आहे. २०१४ च्या पालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आले आहे. एवढी सर्व पदे दिल्यानंतर पुन्हा त्यांनाच स्थायी समितीवर पाठविण्यात काय अर्थ आहे. याशिवाय त्यांच्याच समर्थक नगरसेवकांना स्थायी समितीवर वर्णी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षातील सर्वच पदे चौगुले व त्यांच्या समर्थकांना दिली तर प्रामाणिक, निष्ठावंत, सुशिक्षित नगरसेवकांनी करायचे काय असा प्रश्न त्यांच्याविरोधात बंडखोरी केलेल्या नगरसेवकांनी उपस्थित केला असून, जर त्यांनाच पदे दिली जाणार असल्यास आम्ही राजीनामे देवू असा इशारा दिला आहे. स्थायी समितीसाठी विजय चौगुले, नामदेव भगत, द्वारकानाथ भोईर, माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, रंगनाथ औटी यांच्याऐवजी नवीन नगरसेवकांना संधी मिळावी अशी मागणी आहे. पक्षामध्ये कोणतीही पदे देत असताना सर्वंकष विचार झाला पाहिजे, असे मत उपनेते विजय नाहटा यांच्याकडेही कळविले असून विठ्ठल मोरे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. (प्रतिनिधी)