शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नका, शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 03:53 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन मंदिरांवर मध्यरात्री कारवाई सुरू केली आहे. शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे.

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन मंदिरांवर मध्यरात्री कारवाई सुरू केली आहे. शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे. जुनी मंदिरेही तोडली जात आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाने नागरिकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, अशा शब्दांत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.महानगरपालिकेच्या वतीने धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाईचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. शिवसेनेच्या द्वारकानाथ भोईर यांनी कारवाईच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदविले. मध्यरात्री कारवाई केली जात आहे. जी मंदिरे जुनी आहेत, त्यांच्यावरही कारवाई होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नामदेव भगत यांनीही अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करतो; परंतु प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे. धार्मिक स्थळांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. नागरिकांनी पूजेसाठी सोसायटीमध्ये बांधलेली मंदिरेही तोडली जात आहेत. रिक्षाचालकांनी त्यांच्या स्टँडवर उभारलेले देव्हारेही हटविण्यात आले. रोड, मैदान व इतर महत्त्वाच्या ठिकाणी असलेली बांधकामे हटविण्यास कोणी विरोध करत नाही; परंतु नागरिकांनी श्रद्धेने उभारलेली मंदिरे तोडली जात आहेत. आता नागरिकांनी देव-धर्मही सोडून द्यायचे का? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. मध्यरात्री जाऊन कारवाई केली जाते. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. लाठीचार्ज, गोळीबार होऊन कोणाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन मंदिरे पाडण्याची घाई करत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण व इतर ठिकाणी प्रशासन एवढी घाई करताना दिसत नाही. मध्यरात्रीच्या कारवाईमुळे लोकांमधील असंतोष वाढला आहे. आमच्या डोळ्यांसमोर श्रद्धास्थाने पाडली जात असल्याने आम्ही हिंदुस्थानामध्येच राहात आहोत का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे पोलीस स्टेशनमध्ये स्वत: जाऊन बंदोबस्तासाठी आग्रह धरत आहेत. त्यांना एवढी कसली घाई झाली आहे. आमची मंदिरे पाडली, आम्हाला काही भावना आहेत की नाही? अशीच स्थिती राहिली तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. प्रशांत पाटील यांनीही घणसोलीमध्ये केलेल्या कारवाईविषयी नाराजी व्यक्त केली.मध्यरात्री धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची घाई करणे चुकीचे आहे. धार्मिक स्थळेच नसतील तर पूजा-अर्चा करायची कुठे? हा प्रश्न आहे. आयुक्तांनी याविषयी तत्काळ मिटिंगचे आयोजन करावे व त्या मिटिंगला लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे.- शुभांगी पाटील,सभापती, स्थायी समितीमध्यरात्री धार्मिक स्थळे पाडलेली पाहून, आम्ही नक्की भारतामध्येच आहोत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हालाही भावना आहेत. आमच्या भावनांशी खेळू नये. चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई थांबविली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.- विजय चौगुले,विरोधी पक्षनेतेप्रशासनाने नागरिकांच्या भावनांशी खेळू नये. मंदिरे बांधण्यासाठी परवानगी देत नाही, जागा उपलब्ध करून देत नाही. जुनी धार्मिक स्थळेही मध्यरात्री जाऊन पाडली जात आहेत. आता नागरिकांनी देव-धर्मही सोडून द्यायचा का?- नामदेव भगत,नगरसेवक, शिवसेनामहापालिका २००९ पूर्वीच्या मंदिरांवरही कारवाई करत आहेत. मध्यरात्रीनंतर कारवाई करण्याची आवश्यकता काय? चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.- द्वारकानाथ भोईर,नगरसेवक, प्रभाग-३०घणसोलीमधील जुन्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. अधिकाºयांकडून सुरू असलेल्या कारवाईविषयी नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अधिकाºयांना एवढी घाई का झाली आहे? हेच समजत नाही.- प्रशांत पाटील,नगरसेवक-३२