शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

दिवाळी फराळ 20 टक्क्यांनी महागला, कोरोनामुळे खवय्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 00:43 IST

Diwali : बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. असे काही जण तयार फराळाला पसंती देत असतात.

-  वैभव गायकर

पनवेल : दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे फराळ खरेदीमध्ये सुमारे ४० टक्के ग्राहकांनी पाठ फिरवली असून, या वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिवाळीच्या फराळाच्या किमतीतही २० टक्क्यांची वाढ झाल्याची दिसून येत आहे.बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. असे काही जण तयार फराळाला पसंती देत असतात. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा अनेकांनी या तयार फराळ खरेदीकडे पाठ फिरवली आहे. कोरोनाची भीती, त्यात बाहेरील तेलकट पदार्थ नको, अशी भूमिका काहींनी घेतल्याने फराळ विक्री करणारे बचत गट, दुकानदार या वर्षी आर्थिक संकटात आहेत. दिवाळी म्हटले की गोडधोड फराळाचा बेत हे समीकरणच बनले असताना, कोरोनामुळे फराळ खाणारे खवय्येही गतवर्षीपेक्षा या वर्षी काही प्रमाणात जपूनच अशी भूमिका घेताना दिसून येत आहे.

तयार पदार्थांच्या भीतीनेविक्रीत झाली घट कोरोनाच्या भीतीमुळे मध्यंतरी मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. या अफवा असल्या, तरी अनेक जण अद्याप कोणत्याही वस्तू अथवा पदार्थ खरेदी करताना खूप विचार करताना दिसून येत आहेत. तेलकट पदार्थ खाऊ नयेत, अशी अनेकांनी धारणा कोरोनामुळे झाल्यानेच, कोरोनाच्या भीतीमुळे तयार फराळाच्या विक्रीत यावेळी मोठी घट झालेली दिसून येत आहे.

लॉकडाऊनमुळे सामानाचा तुटवडालॉकडाऊनमध्ये महागाई काही प्रमाणात वाढली आहे. विशेष मध्यंतरी अनेक दुकानांमध्ये सामानाचा तुटवडा भासत असल्याने, या फराळासाठी लागणारे साहित्य (कच्चा माल ) किंमत वाढल्याने त्याचाच परिणाम फराळाच्या किमतींवर पाहावयास मिळत आहे. म्हणून सर्व फराळांच्या किमती १०० ते दिडशे रूपयांनी वाढल्या आहेत.मागणीत सुमारे ४० टक्के घट झाली आहे. तेलकट पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. मात्र, साजुक तुपापासून बनलेल्या बेसनच्या लाडवासारख्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच चकली, अनारसे, करंजी यांनाही मागणी जास्त आहे. परदेशात नातेवाईकांना पाठविण्यासाठी तयार चिवड्याची मागणी अधिक आहे. मात्र कोरोनामुळे तयार फराळाचे दर हे यावेळी दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. 

या वर्षी कोरोनामुळे फराळच्या ऑर्डर खूप कमी प्रमाणात आलेल्या आहेत. कोरोनाच्या सावटामुळे एकमेकांच्या घरी पाहुणे म्हणून जायला अनेक जण यावेळी टाळणार असल्याने फराळाच्या मागणीत घट झाली आहे.   कोरोनामुळे अनेक जण आर्थिक संकटात असल्यानेही मागणीत घट झाल्याचा अंदाज आहे. पण त्याचा  फटका आम्हालाही बसत आहे. - मेघना रगम,बचत गट, पनवेल

टॅग्स :Diwaliदिवाळी