शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

जिल्ह्यात ‘आमदार ग्राम योजना’

By admin | Updated: November 25, 2015 02:07 IST

सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर आता आमदार ग्राम योजना आखण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील १० आमदारांपैकी फक्त तीनच आमदारांनी याला प्रतिसाद दिला आहे

आविष्कार देसाई, अलिबागसांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर आता आमदार ग्राम योजना आखण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील १० आमदारांपैकी फक्त तीनच आमदारांनी याला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्याबाहेरच्या दोन आमदारांनीही दोन गावे दत्तक घेत जिल्ह्यातील आमदारांपुढे आदर्श घालून दिला आहे. मुदत संपली तरी अद्याप जिल्ह्यातील उर्वरित आमदारांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासाची ही नवी संकल्पना मुदतीमध्ये पूर्ण होते की नाही हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कृतीतूनच समोर येणार आहे.सरकारी पातळीवरुन ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात विकास साधण्यासाठी विविध संकल्पना मांडण्यात येत आहेत. विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शहरी भागाच्या प्रवाहात आणणे, त्यांना भौतिक, सामाजिक आणि मानव विकासाच्या सुविधा देणे हा या मागचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण भागाचा विकास करता यावा यासाठी आमदार ग्राम योजना १५ आॅगस्ट २०१५ च्या सरकारी निर्णयाने कार्यान्वित करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर २०१५ अशी मुदत वाढवून सरकारने डेडलाइन निश्चित केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सात विधानसभा सदस्य असून, तीन विधान परिषदेचे सदस्य असे एकूण १० आमदार निवडून आलेले आहेत. यापैकी अलिबागचे आमदार सुभाष पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील धोकवडे ग्रामपंचायतीचा समावेश आमदार ग्राम योजनेत केला आहे. त्याचप्रमाणे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील तुर्भे गावचा विकास करण्याचे ठरविले आहे, तर पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी सुधागड तालुक्यातील महागावला दत्तक घेतले आहे.नवी मुंबईमधील आमदार मंदा म्हात्रे यांनी खालापूर तालुक्यातील मोरबे आदिवासी वाडीपाड्यांचा विकास करायचे ठरविले आहे. विक्रोळीचे आमदार सुनील राऊळ यांनी विकासासाठी अलिबाग तालुक्यातील परहूरवर लक्ष केंद्रित केले आहे. परजिल्ह्यातील आमदारांनी गावे दत्तक घेतली असताना येथील आमदारांना विकासासाठी कोणत्या गावाची निवड करायची हेच सुचलेले नसल्याचे दिसून येते. आमदारांच्या वाट्याला प्रतिवर्षी येणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या विकास निधीतून दत्तक घेतलेल्या गावाचा विकास साधायचा आहे. त्याचप्रमाणे परिसरातील विविध कंपन्यांच्या सीएसआरमधूनही गावच्या विकासासाठी निधी घेऊ शकणार आहेत.