शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जिल्ह्यात ‘आमदार ग्राम योजना’

By admin | Updated: November 25, 2015 02:07 IST

सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर आता आमदार ग्राम योजना आखण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील १० आमदारांपैकी फक्त तीनच आमदारांनी याला प्रतिसाद दिला आहे

आविष्कार देसाई, अलिबागसांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर आता आमदार ग्राम योजना आखण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील १० आमदारांपैकी फक्त तीनच आमदारांनी याला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्याबाहेरच्या दोन आमदारांनीही दोन गावे दत्तक घेत जिल्ह्यातील आमदारांपुढे आदर्श घालून दिला आहे. मुदत संपली तरी अद्याप जिल्ह्यातील उर्वरित आमदारांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासाची ही नवी संकल्पना मुदतीमध्ये पूर्ण होते की नाही हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कृतीतूनच समोर येणार आहे.सरकारी पातळीवरुन ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात विकास साधण्यासाठी विविध संकल्पना मांडण्यात येत आहेत. विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शहरी भागाच्या प्रवाहात आणणे, त्यांना भौतिक, सामाजिक आणि मानव विकासाच्या सुविधा देणे हा या मागचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण भागाचा विकास करता यावा यासाठी आमदार ग्राम योजना १५ आॅगस्ट २०१५ च्या सरकारी निर्णयाने कार्यान्वित करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर २०१५ अशी मुदत वाढवून सरकारने डेडलाइन निश्चित केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सात विधानसभा सदस्य असून, तीन विधान परिषदेचे सदस्य असे एकूण १० आमदार निवडून आलेले आहेत. यापैकी अलिबागचे आमदार सुभाष पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील धोकवडे ग्रामपंचायतीचा समावेश आमदार ग्राम योजनेत केला आहे. त्याचप्रमाणे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील तुर्भे गावचा विकास करण्याचे ठरविले आहे, तर पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी सुधागड तालुक्यातील महागावला दत्तक घेतले आहे.नवी मुंबईमधील आमदार मंदा म्हात्रे यांनी खालापूर तालुक्यातील मोरबे आदिवासी वाडीपाड्यांचा विकास करायचे ठरविले आहे. विक्रोळीचे आमदार सुनील राऊळ यांनी विकासासाठी अलिबाग तालुक्यातील परहूरवर लक्ष केंद्रित केले आहे. परजिल्ह्यातील आमदारांनी गावे दत्तक घेतली असताना येथील आमदारांना विकासासाठी कोणत्या गावाची निवड करायची हेच सुचलेले नसल्याचे दिसून येते. आमदारांच्या वाट्याला प्रतिवर्षी येणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या विकास निधीतून दत्तक घेतलेल्या गावाचा विकास साधायचा आहे. त्याचप्रमाणे परिसरातील विविध कंपन्यांच्या सीएसआरमधूनही गावच्या विकासासाठी निधी घेऊ शकणार आहेत.