शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

दहीहंडी उत्सवावर निर्बंधांचा निरुत्साह; काही ठिकाणी साधा उत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:31 IST

न्यायालयाच्या निर्बंधांमुळे पनवेल परिसरात दहीहंडी महोत्सवातील निरुत्साहाचे सावट जाणवले. न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून उत्सव साजरा करता येत नसल्याने अनेक मंडळांनी उत्सव रद्द करून कित्येक वर्षांची परंपरा खंडित केली.

कळंबोली : न्यायालयाच्या निर्बंधांमुळे पनवेल परिसरात दहीहंडी महोत्सवातील निरुत्साहाचे सावट जाणवले. न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून उत्सव साजरा करता येत नसल्याने अनेक मंडळांनी उत्सव रद्द करून कित्येक वर्षांची परंपरा खंडित केली, तर काही मंडळांनी पारंपरिक व साध्या पध्दतीने उत्सव साजरा केला.मुंबई, ठाणे या महानगराप्रमाणे पनवेल परिसरातही काही वर्षांपासून दहीहंडी महोत्सवाला चांगले ग्लॅमर प्राप्त झाले होते. या भागात २० पेक्षा जास्त गोविंद पथके आहेतच. त्याचबरोबर दहीहंडी उत्सव मंडळाची संख्याही मोठी होती. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, खारघर या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबईतील शेकडो गोविंदा पथक येवून सलामी देत तर काही पथक हंड्याही फोडत असत.यंदा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक मंडळांवर अनेक निर्बंध आले आहेत. काही दिवसापूर्वी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी मंडळाची बैठक घेवून आचारसंहिता आखून दिली. त्याचबरोबर स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत बैठका घेण्यात आल्या. दहीहंडीची मर्यादित उंची, डीजे व साऊंड सिस्टीम न लावणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आदी नियम या वेळी सांगण्यात आले. सिडको आणि महापालिकेने सुध्दा चौकात व रस्त्यावर दहीहंड्या बांधण्यास परवानगी नाकारली होती. गोविंदा पथकाच्या सुरक्षिततेची हमी आयोजकांनी घेणे बंधनकारक होती. तसेच विविध बंधने घालण्यात आले होते. या कारणामुळे नवीन पनवेल परिसरातील मोठ्या दहीहंड्या यंदाही झाल्या नाहीत.खांदा वसाहतीत संजय भोपी सोशल क्लबच्या वतीने दरवर्षी लाखो रुपयांचे बक्षीस असणारी दहीहंडी लावण्यात येत असे. दोन वर्षापासून आयोजकांनी हा उत्सव रद्द केला. क्र ांतीसेवा संघाच्या वतीने शिवासंकुल येथील मोकळ्या जागेत उत्सव साजरा करण्यात आला. मात्र दरवर्षीप्रमाणे डामडौल यंदा दिसून आला नाही. अतिशय पारंपरिक व साध्या पध्दतीने दहीहंडी उत्सव करण्यात आला. कळंबोलीतील जगदीश गायकवाड सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने मोकळ्या मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र यंदा येथे गणपती कला केंद्र टाकण्यात आले. त्यामुळे येथे उत्सव साजरा करण्यात आला नाही. रोडपालीत सुध्दा सुदाम पाटील या उत्सवाचे आयोजन करीत असत, परंतु या वर्षी उत्सव करण्यात आला नाही. नगरसेवक संतोष शेट्टीच्या श्री. रामशेठ ठाकूर विचार मंचाची श्री रामश्री दहीहंडी उत्सव साजरा झाला. त्याचबरोबर नगरसेवक तेजस कांडपिळे यांच्या वतीने भव्य दिव्य उत्सव करण्यात आला.गोविंदा पथकांनीही फिरवली पाठपनवेल परिसरातील मोठमोठ्या दहीहंडी उत्सव मंडळांनी उत्सव यावर्षी केला नाही. काहींनी तो अतिशय पारंपरिक पध्दतीने साजरा केला. त्यामुळे मुंबई, ठाणे येथील नामांकित गोविंदा पथकाने पनवेलकडे पाठ फिरवली. अतिशय कमी संख्येने गोविंदा पथक पनवेलला आले होते. त्यातच पाऊस नसल्यानेही या उत्सवाचा उत्साह आणखी कमी झाला. त्यामुळे सायंकाळी काही प्रमाणात उत्साह दिसून आला.

टॅग्स :Dahi Handiदही हंडी