शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 23:58 IST

विसर्जन स्थळावरील बहुतांश गर्दीला आळा बसणार आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव टाळण्यासाठी विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप दिला जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील शंभरहून अधिक मंडळांनी आपला हा निर्णय प्रशासनाला कळवला आहे. यामुळे विसर्जन स्थळावरील बहुतांश गर्दीला आळा बसणार आहे.विसर्जनासाठी होणारा खर्च, गर्दी टाळण्यासाठी स्थापनेच्या ठिकाणीच गणरायाला निरोप देण्यासाठी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्यांपासून मंडपातच कृत्रिम तलाव बनवले जाणार आहेत. बहुतांश मंडळांनी पीओपीऐवजी शाडूच्या मूर्तींना प्राधान्य दिले आहे. आजवर या मंडळांकडून ७ ते १० फुटांच्या मूर्तीची स्थापना केली जात होती. मात्र यंदा सामाजिक जबाबदारीची जाणीव या मंडळांकडून राखण्यात आली आहे.यंदा बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवसाला तसेच गौरीसोबत होणार आहे. त्यामुळे या सर्व विसर्जनस्थळांवर गर्दी होणार आहे. त्यामुळे ते पाहता शंभरहून अधिक मंडळांनी विसर्जन मार्गावरील गर्दी, यंत्रणेवरील ताण टाळण्यासाठी विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप देण्याचा घेतलेला निर्णय इतर मंडळांसाठी आदर्श निर्माण करणारा ठरणार आहे.>यावर्षी कोणताही देखावा न उभारता केवळ दोन फूट श्रीच्या शाडूच्या मूतीर्ची स्थापना करून उत्सव साजरा करत आहोत. तर विसर्जन मिरवणूक, भाविकांची गर्दी तसेच विसर्जन स्थळावरील ताण टाळण्यासाठी मंडळाच्या ठिकाणीच मूर्तीचे कृत्रिम तळ्यात विसर्जन केले जाणार आहे. - ललित सकट.अध्यक्ष - सार्वजनिक उत्कर्ष मित्र मंडळ, कोपर खैरणे

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव