शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

तलासरीत आरोग्य केंद्राची तोडफोड

By admin | Updated: November 15, 2014 02:21 IST

तलासरी आरोग्य विभागांतर्गत असलेल्या उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या 7क्वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

तलासरी : तलासरी आरोग्य विभागांतर्गत असलेल्या उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या 7क्वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाइकांनी आरोग्य केंद्राची तोडफोड करीत आरोग्य कर्मचा:याबरोबर तेथे परिस्थिती हाताळण्यासाठी गेलेल्या सहायक गटविकास अधिका:यांनाही मारहाण करून त्यांची गाडी फोडली. 
उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी सकाळी मशापाडा येथील मंगल पांडय़ा कुरकुडे (7क्) यांना गंभीरावस्थेत उपचारासाठी त्यांच्या नातेवाइकांनी दाखल केले. परंतु त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तत्काळ उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मंगल कुरकुडे यांचा मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरली व दोन तासांत गावातील दीडशे-दोनशेचा संतप्त जमाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा झाला व त्यांनी आरोग्य केंद्रावर दगडविटांचा भडिमार केला. दरम्यान, आरोग्य कर्मचारी पळून जाऊ नयेत म्हणून दवाखान्याला बाहेरून कुलूप लावून कर्मचा:यांना आतमध्ये कोंडून हल्ला करण्यात आला. यात संपूर्ण प्राथमिक आरोग्याचे जमावाकडून नुकसान करण्यात आले.
बालदिनानिमित्त पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी तलासरीत होते. त्यांना घटना समजताच त्यांनी तत्काळ सहायक गटविकास अधिकारी वसंत वरठा यांना घटनास्थळी पाठवले; परंतु जमावाने त्यांनाही मारहाण करून त्यांच्या सरकारी वाहनाची तोडफोड केली. या वेळी तलासरी पोलीस घटनास्थळी पोहोचले तरीही जमावाकडून आरोग्य केंद्राची तोडफोड सुरूच होती. यात डॉक्टर सचिन माने, परिचारिका व इतर कर्मचा:यांनाही जबर मारहाण केली. तर जमावाकडून परिचारिकेचा विनयभंग करण्याचा प्रय}ही झाला. 
पोलिसांनी या वेळी बळाचा वापर करून संतप्त जमावाला पांगविले. दरम्यान रुग्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तलासरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
घटनास्थळी गटविकास अधिका:यांना पाठवून चौकशी 
करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन 
माने, कार्यरत एएनएम व कम्पाउंडर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. (वार्ताहर)
 
जमावाला शांत करायचा प्रयत्न करूनही जमावाने सरकारी वाहनाचे व आरोग्य केंद्राचे प्रचंड नुकसान केले. आदिवासी ग्रामीण भागात अधिकारी कर्मचा:यांनी काम कसे करायचे हा प्रश्न पडला आहे, अशी प्रतिक्रिया सहायक गटविकास अधिकारी वसंत वरठा यांनी दिली.