शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पाच नगरसेवक ठरणार अपात्र

By admin | Updated: January 7, 2016 00:32 IST

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दाखला देण्यास विलंब झाल्याचे कारण पुढे करीत स्वत:चा बचाव करू पाहणाऱ्या पाच नगरसेवकांचे नगरसेवकपद

शशी करपे,  वसईजात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दाखला देण्यास विलंब झाल्याचे कारण पुढे करीत स्वत:चा बचाव करू पाहणाऱ्या पाच नगरसेवकांचे नगरसेवकपद कायद्यानुसार रद्द होत असून त्यांना पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक देखील लढता येणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. वसई विरार महापालिकेतील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक समीर डबरे, अतुल साळुंखे, शबनम शेख, हेमांगी पाटील आणि शिवसेनेचे स्वप्नील बांदेकर यांनी निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला न दिल्याने त्यांचे नगरसेवकपद होणे जवळपास निश्चित झाले आहे. पालिकेची १४ जूनला निवडणूक होऊन १६ जूनला निकाल लागला. राखीव जागांवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या नगरसेवकांनी निकाल लागल्यानंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला सादर करणे बंधनकारक आहे. त्याचा कालावधी १६ डिसेंबरला संपल्यानंतर ज्या नगरसेवकांनी दाखला दिला नाही त्यांच्याबद्दलचा सविस्तर अहवाल महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवून योग्य कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्याची विनंतीही केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून महापालिकेला अद्याप कोणताच अभिप्राय आलेला नाही. तो आल्यानंतरच नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे.पाचही नगरसेवकांनी दाखला मिळण्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विलंब लागल्याचे कारण देत स्वत:चा बचाव सुरु केला आहे. स्वप्नील बांदेकर आणि अतुल साळुंखे यांनी मुदत संपल्यानंतर दोन दिवसांनी दाखला सादर केला आहे. तर शबनम शेख यांनी १ जानेवारीला दाखला सादर केला. समीर डबरे यांच्या दाखल्याला हेमा अल्फान्सो यांनी हरकत घेतल्याने त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या संपूर्ण प्रकरणी लोकमतने राज्य निवडणूक आयोग आणि कोकण भवन येथील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून माहिती घेतली असता तेथील अधिकाऱ्यांना नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीवरून पाचही नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज सादर करताना राखीव जागांवर निवडणूक लढवत असलेल्या प्रत्येक उमेदवारांकडून हमीपत्र घेतले जाते. त्यात, जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत सादर करण्याबाबतची हमी मी या हमीपत्राद्वारे देत आहे, निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास माझी निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि मी महानगरपालिका सदस्य राहण्यास अपात्र ठरेन, असे शपथपत्रावर लिहून घेतले जाते. त्यामुळे हमीपत्रानुसार दाखला वेळेत मिळवून तो सादर करण्याची जबाबदारी संबंधित सदस्याची असते. म्हणूनच विलंब झाल्यास सदस्याला जबाबदार धरून त्याचे नगरसेवकपद आपोआप रद्द होते, असेही समितीच्या अधिकाऱ्याने सांगितले.समितीला कागदपत्रे सादर केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता केलेली असेल तर दाखला ताबडतोब दिला जातो. कागदपत्रांची कमतरता असेल तर समिती संबंधितांना वारंवार लेखी कळवत असते. मुदतीचे बंधन समितीवर नसते. म्हणूनच मुदतीत दाखला हवा असेल तर संबंधितांनी योग्य कागदपत्रे सादर करून पाठपुरावा करणे गरजेचे असते, असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.