शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नळजोडण्या खंडित केल्याने असंतोष

By admin | Updated: May 15, 2016 04:06 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तुर्भे नाका हनुमान नगरमधील अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या. नागरिकांचे पाणी बंद करून ते गटारात सोडून दिले आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तुर्भे नाका हनुमान नगरमधील अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या. नागरिकांचे पाणी बंद करून ते गटारात सोडून दिले आहे. मागणी करूनही अधिकृत नळजोडणी न दिल्यामुळे व अचानक पाणी थांबविल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पाणीपुरवठा विभागाने एक आठवड्यापासून अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई सुरू केली आहे. जवळपास ५०० नळजोडण्या खंडित केल्या आहेत. शुक्रवारी तुर्भे नाका येथील हनुमान नगरमध्ये कारवाई करण्यात आले. नागरिकांचा पाणीपुरवठाच खंडित करण्यात आला. नागरिकांनी विनंती केल्यानंतरही प्रशासनाने काहीही ऐकले नाही. आयुक्तांचे आदेश आहेत, यामुळे आता अधिकृत कनेक्शन घेणाऱ्यांनाच पाणी मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले. ऐन उन्हाळ्यात ३०० पेक्षा जास्त नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. पाणीपुरवठा विभागाने कारवाई करून नागरिकांच्या घरामध्ये जाणारे पाणी गटारामध्ये सोडून दिले आहे. हजारो लीटर पाणी वाया जात आहे. आम्हाला पिण्यासाठी पाणी देत नाही व दुसरीकडे गटारात पाणी जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. हनुमान नगरमधील अनेक नागरिकांनी २०१३ मध्येच महापालिकेकडे अधिकृत नळजोडणी मिळावी, यासाठी अर्ज केले आहेत. आवश्यक कागदपत्रे व पालिकेचे शुल्कही भरले आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पाणीपुरवठा विभागात फेऱ्या मारूनही अधिकृतपणे नळ दिलेला नाही. पालिकेचे कर्मचारी वारंवार हेलपाटे मारावे लावत होते. तुम्हाला पाणी मिळत आहे, मग विनाकारण विलंब का करता, अशी उत्तरे दिली जात होती. पैसे भरून पाणी दिले नाही व आता अधिकृत नळ घेतला नसल्याचे कारण सांगून मे महिन्यात पाणीपुरवठा थांबविल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गरिबांना पाण्यापासून वंचित ठेवले जाऊ नये. ज्यांनी वेळेत नळजोडण्या दिल्या नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.