शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

घणसोलीत महापालिकेच्या कारवाईविरोधात असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:41 IST

नव्याने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु कारवाई करताना अनेकदा नियमांना बगल दिली जात

नवी मुंबई : नव्याने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु कारवाई करताना अनेकदा नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रहिवाशांत महापालिकेच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे. नोसिल नाक्यावर बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईवर येथील बांधकामधारकांनी तीव्र आक्षेप घेत महापालिकेच्या मनमानीचा निषेध केला आहे.पावसाळा तोंडावर आल्याने अनेक जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नोसिल नाक्यावर असलेल्या बैठ्या चाळीत मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या दुरुस्तीची कामे मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता घणसोली विभाग कार्यालयाने बुधवारी येथील चाळीवर कारवाई करण्यात आली. यासंदर्भात रहिवाशांनी जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत रहिवाशांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रहिवाशांत कमालीचा असंतोष पसरला आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार विभाग कार्यालयामार्फत आपापल्या विभागातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. असे असले तरी गाव-गावठाणात सुरू असलेल्या तीन ते चारमजल्याच्या बांधकामांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायतीच्या काळातील बैठ्या चाळीवरकारवाई करून महापालिकेला काय सिध्द करायचे आहे, असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.