शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसाहाय्य देण्याचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की

By admin | Updated: April 19, 2017 00:51 IST

पालिका शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघात घडल्यास मदत करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता.

नवी मुंबई : पालिका शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघात घडल्यास मदत करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. विद्यार्थ्यांसाठी विमा योजना असताना हा प्रस्ताव कशासाठी असा प्रश्न नगरसेवकांनी विचारून प्रशासनाला धारेवर धरले. यामुळे ही योजना मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली. नवी मुंबई महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला किंवा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्यांच्या पालकांना मदत मिळावी यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढण्यात येतो. पाच वर्षामध्ये यासाठी तब्बल ६१ लाख २० हजार रूपये विम्याचा हप्ता भरण्यात आला आहे. विमा कंपनीकडून लाभार्थ्यांना २८ लाख १२ हजार रूपये देण्यात आले आहेत. विमा काढण्यासाठी भरलेली रक्कम व प्रत्यक्ष मिळालेला लाभ यामध्ये तफावत असल्याने पालिकेने नवीन प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेत सादर केला होता. या प्रस्तावाविषयी अनेक नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सूरज पाटील यांनी विमा कंपनीला वेळेवर हप्ते भरले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. वाशीमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याला विम्याची रक्कम मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. कोपरी येथील नगरसेविका उषा भोईर यांनीही मृत विद्यार्थ्याच्या पालकाला मदत मिळाली नसल्याचे सांगितले. सभागृह नेते जयवंत सुतार यांनीही शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. शिक्षण मंडळाची मनमानी सुरू असून विद्यार्थ्यांना गणवेश व इतर वस्तूंपासून वंचित ठेवल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. शिवसेना नगरसेविका सरोज पाटील यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले. अपघातामध्ये मृत्यू झाल्यास पालकांना ३ लाख रूपयांची तरतूद केली आहे ती वाढवून १० लाख करावी व कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख ऐवजी ५ लाखांची मदत करण्याची उपसूचनाही केली. नामदेव भगत, मनोज हळदणकर, संजू वाडे व इतर नगरसेवकांनी मनोगत व्यक्त केले. पालिका प्रशासनाने आतापर्यंत नियमितपणे विमा योजनेचे हप्ते भरले आहेत का याविषयी विचारणा केली होती. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी या शैक्षणिक वर्षासाठीचे विम्याचे पैसे भरले असल्याचे सांगून हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक आक्रमक झाल्यामुळे प्रशासनावर पुन्हा एकदा ठराव मागे घेण्याची वेळ आली असून योग्य अभ्यास न करता व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने वारंवार अशी वेळ प्रशासनावर येवू लागली आहे. (प्रतिनिधी)