शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

दिघी बंदर रेल्वेला जोडणार !

By admin | Updated: September 14, 2016 04:43 IST

कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे

नितीन देशमुख,  पनवेलकोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला रोह्याशी जोडणाऱ्या मार्गबाबत सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रेल्वे स्थानकाच्या भुमिपूजनासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नुकतेच येथे आले होते. रेल्वे मार्गामुळे कोकण उर्वरित महाराष्ट्राला जोडले जाऊन विकासाच्या वाटा उघडणार आहेत. पुढील काही वर्षात रेल्वे क्षेत्रात जवळपास १५० अब्ज रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून एल.आय.सी. आणि रेल्वे पायाभूत घटक हे याचे प्रमुख आर्थिक स्त्रोत आहेत. देशभरातील रेल्वे मार्गाच्या जोडणीसाठी तब्बल ८०५० कोटी रु पये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.देशाला लाभलेल्या साडेसात हजार किलोमीटर किनारपट्टीपैकी १० टक्के किनारपट्टी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातील नैसर्गिक साधन संपत्ती, शेत माल, परदेशात पाठवण्यासाठी किंवा या मालासाठी लागणाऱ्या आणि आयात होणाऱ्या उपयुक्त वस्तु परदेशातून आणण्यासाठी कोकण किनारपट्टीवरील बंदरे उपयुक्त आहेत. बंदरांचा विकास करण्यासाठी दिघी बंदर लिमिटेड या खाजगी कंपनी बरोबर होणारा करार महत्वाचा ठरणार आहे. रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी बंदर लिमिटेड यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी बंदर लिमिटेड यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. रेल्वे विकास निगमचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्नीहोत्री आणि दिघी पोर्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री हे रोहा - दिघी पोर्ट रेल्वे मार्ग जोडणी करारावर लवकरच स्वाक्षरी करणार आहेत.करारावर स्वाक्षरी करण्याच्या वेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा, रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद व राज्याचे परिवहन सचिव गौतम चटर्जी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा होणारा सामंजस्य करार महत्वाचा ठरणार आहे.