शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

आदिवासींच्या निधीतून इतरांचाच विकास

By admin | Updated: January 5, 2016 01:02 IST

गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे

बिर्लागेट : गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासींच्या विकासाकरिता असलेल्या निधीतून भलत्याच ठिकाणी कामे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मार्ट शहराच्या योजनेत आदिवासींच्या वाड्यावस्त्यांना स्थान आहे किंवा कसे, असा सवाल केला जात आहे.राज्यातील आघाडी सरकारने २००८-०९ मध्ये आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठक्कर बाप्पा योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत ११ कामे निश्चित केली आहे. यामध्ये सिमेंट रस्ते, समाजमंदिर, शाळा, कम्पाउंड, विहिरी दुरुस्ती, नळयोजना, स्मशानभूमी, व्यायामशाळा, गटारे, शौचालये आदी कामांचा समावेश असून आदिवासी समाजाची ५० टक्के लोकवस्ती असली तरी त्या वाडीवस्तीवर या योजना राबवाव्यात, असे सरकारी आदेशात म्हटले होते.कल्याण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने अथवा पाणीपुरवठा विभागाने मागील तीन वर्षांत एकही योजना राबविली नाही. विशेष म्हणजे तालुक्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या १८ ते २० हजारांच्या आसपास असताना कल्याणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केळणी येथे आदिवासी योजनेतून चक्क गावात रस्ता तयार केला. असेच प्रकार इतरही गावांत झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.कित्येक वाड्यावस्त्यांवर रस्ते, लाइट, पाणी, शाळा नाहीत, तर या नागरिकांना रेशनकार्ड, घरपट्टी, जातीचे दाखले अशी महत्त्वाची कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गोरगरीब दलित, आदिवासींच्या योजना अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे भलत्याच ठिकाणी राबविल्या जात आहेत, असे आदिवासी समाजातील लोकांचे म्हणणे आहे.