शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

आदिवासींच्या निधीतून इतरांचाच विकास

By admin | Updated: January 5, 2016 01:02 IST

गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे

बिर्लागेट : गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासींच्या विकासाकरिता असलेल्या निधीतून भलत्याच ठिकाणी कामे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मार्ट शहराच्या योजनेत आदिवासींच्या वाड्यावस्त्यांना स्थान आहे किंवा कसे, असा सवाल केला जात आहे.राज्यातील आघाडी सरकारने २००८-०९ मध्ये आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठक्कर बाप्पा योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत ११ कामे निश्चित केली आहे. यामध्ये सिमेंट रस्ते, समाजमंदिर, शाळा, कम्पाउंड, विहिरी दुरुस्ती, नळयोजना, स्मशानभूमी, व्यायामशाळा, गटारे, शौचालये आदी कामांचा समावेश असून आदिवासी समाजाची ५० टक्के लोकवस्ती असली तरी त्या वाडीवस्तीवर या योजना राबवाव्यात, असे सरकारी आदेशात म्हटले होते.कल्याण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने अथवा पाणीपुरवठा विभागाने मागील तीन वर्षांत एकही योजना राबविली नाही. विशेष म्हणजे तालुक्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या १८ ते २० हजारांच्या आसपास असताना कल्याणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केळणी येथे आदिवासी योजनेतून चक्क गावात रस्ता तयार केला. असेच प्रकार इतरही गावांत झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.कित्येक वाड्यावस्त्यांवर रस्ते, लाइट, पाणी, शाळा नाहीत, तर या नागरिकांना रेशनकार्ड, घरपट्टी, जातीचे दाखले अशी महत्त्वाची कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गोरगरीब दलित, आदिवासींच्या योजना अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे भलत्याच ठिकाणी राबविल्या जात आहेत, असे आदिवासी समाजातील लोकांचे म्हणणे आहे.