शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

स्मशानभूमीचा विकास झाडांत अडला

By admin | Updated: December 21, 2015 02:07 IST

पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या विकासाला जुलैच्या महासभेत मान्यता मिळाली. परंतु झाडांच्या अस्तित्वाने अद्याप विकास झाला

भार्इंदर : पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या विकासाला जुलैच्या महासभेत मान्यता मिळाली. परंतु झाडांच्या अस्तित्वाने अद्याप विकास झाला नसून ही झाडे पुनर्रोपणासाठी स्थलांतरित करून विकासाचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी ४ महिन्यांपासून प्रतीक्षा सुरू आहे.‘ड’ वर्गातील काही महापालिकांच्या तुलनेत येथील स्मशानभूमी विकसित असल्या तरी त्यांतील काहींचा विकास अत्याधुनिक पद्धतीने व्हावा, यासाठी जुलै २०१५ च्या महासभेत सुरुवातीला भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या विकासाला मंजुरी दिली. त्यासाठी ९० लाखांच्या आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने पहिल्या टप्प्यात विकासावर ५० लाख खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, प्रशासनाने कामाला सुरुवात केल्यानंतर स्थानिक नगरसेवक व रहिवाशांनी विकासाच्या आराखड्यावर हरकती घेत त्यात बदल करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने सुरुवातीचा आराखडा बदलल्याने पहिल्या टप्प्यातील विकासाचा खर्च २६ लाखांनी वाढून तो ७६ लाखांवर गेला आहे. बदललेल्या आराखड्यानुसार होणारा विकास स्मशानभूमीतील सुमारे २० मोठ्या झाडांच्या अस्तित्वाने अडल्याने ही झाडे पुनर्रोपणासाठी स्थलांतरित करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार महिन्यांपासून सुरू आहे. या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्यांकरिता पायऱ्यांच्या धर्तीवर आरसीसीची आसनव्यवस्था करण्यात येणार असून त्याखाली लाकडांचे गोदाम, कार्यालयासाठी खोल्या बांधण्यात येणार आहेत. आसनव्यवस्थेसमोरच मृतदेह जाळण्यासाठी ४ शेगड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी फायबर मोल्डिंगच्या शेड बांधण्यात येणार असून उर्वरित जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हा विकास साधण्यासाठी त्याच्या आड येणारी झाडे स्थलांतरित करण्याकरिता वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सतत पाठपुरावा करण्यात येत असला तरी ही झाडे अद्याप स्थलांतरित करण्यात आलेली नाही. याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले की, विकास आराखडा बदलल्याने झाडांचा अडसर निर्माण झाला असून त्यांचे इतरत्र रोपण केल्यास विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच वृक्ष प्राधिकरण विभागाचे प्रमुख व उपायुक्त डॉ. दीपक पवार-कुरुळेकर यांनी सांगितले की, ही झाडे स्थलांतरित करण्याच्या मागणीवर वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता घेण्यात येणार असून समितीच्या निर्णयानुसारच कार्यवाही करण्यात येणार आहे.