शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्तांना वेसण घालण्याचा ‘देशमुख पॅटर्न

By admin | Updated: November 24, 2015 01:45 IST

अंबरनाथ नगपरिषदेतील सफाई कर्मचारी हे कामावर असतांना इतर व्यवसाय करणे आणि रिक्षा चालवणे हे काम उघडपणे करीत होते.

अंबरनाथ नगपरिषदेतील सफाई कर्मचारी हे कामावर असतांना इतर व्यवसाय करणे आणि रिक्षा चालवणे हे काम उघडपणे करीत होते. हजेरी लावा आणि इतर खाजगी कामासाठी निघून जा, अशी परिस्थिती होती. या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे शहरातील दररोजची सफाई अर्धवट राहत होती. या कर्मचाऱ्यांच्या कितीही तक्रारी केल्या तरी हे कर्मचारी मात्र सुधारत नव्हते. या बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची किमया अवघ्या महिन्याभरात साधली ती मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी. आज पालिकेतील सर्व सफाई कामगार नियमित कामावर हजर असतात. अंबरनाथ शहराची लोकसंख्या वाढत असतांना या शहराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे होते. मात्र शासनाच्या आकृतीबंधानुसार अस्तित्वातील कर्मचारीच जास्त दाखविण्यात आले. आज शहरातील ५७ प्रभागांच्या स्वच्छतेसाठी ८४९ कर्मचारी आहेत. मात्र त्यातील ६० हून अधिक कर्मचारी हे पालिकेच्या विविध विभागात शिपाई म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे सरासरी ८०० पेक्षा कमी कर्मचारी हे शहरातील स्वच्छतेचे काम करीत आहेत. मात्र प्रभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी बहुसंख्य कर्मचारी हे केवळ हजेरी बुकावर हजेरी लावून निघून जात होते. एवढेच नव्हे तर काही मुजोर कामगार सकाळी हजेरी लावल्यावर थेट कामावर न जाता खाजगी कामासाठी निघून जात होते. त्यातील काही कामगार हे भाजी विक्रीचे काम करतात तर काही कर्मचारी हे दिवसभर आॅन ड्युटी रिक्षा चालवतात. परत दुपारी शेवटची हजेरी लावण्यासाठी हे हजेरीशेडवर जातात. त्यामुळे हे कर्मचारी केवळ हजेरी लावण्याचा पगार पालिकेकडून घेत असत. त्यांच्या या कामचुकारपणाला प्रत्येक हजेरी शेडवरील अधिकारी देखील तेवढाच जबाबदार होते. कर्मचाऱ्यांना हजेरी लावून देण्यासाठी हेच अधिकारी मदत करीत असत. या कामासाठी संबंधीत अधिकाऱ्याला महिन्याकाठी विशिष्ट रक्कम न देण्यात येत होती. कामचुकार कर्मचाऱ्यांसोबतच इतर प्रामाणिक कर्मचाऱ्यालाही एखाद दिवस काही खाजगी कामानिमित्त जायचे असले तरी त्याचे पैसे या अधिकाऱ्याला मोजावे लागत होते. कर्मचारी आणि अधिकारी यांचे संगनमत असल्याने अनेक कर्मचारी हे बिनधास्त कामचुकारपणा करित होते. महिला कर्मचाऱ्यांची देखील हीच परिस्थिती होती. त्या देखील हजेरी लावून खाजगी साफसफाईच्या कामासाठी जात होत्या.मात्र अंबरनाथचे नव्याने नियुक्त झालेले मुख्याधिकारी यांनी कामकाज सुरू करताच सर्वात अगोदर कर्मचारी आणि अधिकारी यांना शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेतला. सकाळी ७ वाजताच हजेरी शेडवर जाऊन कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आल्याने कामचुकार कामगार, अधिकारी चांगलेच धास्तावले. पहिल्या धाडीतच त्यांना ८६ कामचुकार कामगार दिसले. तर १२ कामगार नियमित गैरहजर असल्याचे आढळले. सर्व कामगारांना निलंबित करुन आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. एवढेच नव्हे तर ८६ कामगारांना नोटीस काढली. ही कारवाई करुन न थांबता आठवड्यातून तीन ते चार दिवस दररोज सकाळी हजेरी शेड आणि शहरातील सफाईच्या कामाची पाहणी करण्याचे काम मुख्याधिकाऱ्यांनी सुरु केले. मुख्याधिकाऱ्यांच्या या भूमिकेनंतर पालिकेचे सफाई कर्मचारी चांगलेच वठणीवर आलेत. साहेब कधीही येतील, या भीतीने आता प्रत्येक कर्मचारी पूर्ण गणेवेशात कामावर वेळेत हजर राहतात. दुपारी २ वाजेपर्यंत काम करतांना दिसतात. सकाळी १० नंतर प्रभागात न दिसणारे सफाई कर्मचारी दुपारपर्यंत काम करीत असल्याचे पाहून आता नागरिकच अचंबित झाले आहेत. कामचुकार कर्मचारी कामावर नियमित येऊ लागल्याने या कर्मचाऱ्यांना चांगली शिस्त लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.