शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

चांधईत पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 02:57 IST

कर्जत तालुक्यातील अनेक गावे व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना अनेक दानशूर व समाजसेवक तालुक्यातील अनेक भागांतील नागरिकांना कसे पाणी पोचेल

नेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक गावे व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना अनेक दानशूर व समाजसेवक तालुक्यातील अनेक भागांतील नागरिकांना कसे पाणी पोचेल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. मात्र चांधई गावच्या चारही बाजूने पाण्याचे स्रोत उपलब्ध असतानाही कोणतेही प्रशासन गावापर्यंत पाणी पोचवू शकले नसल्याने चांधईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.कर्जत तालुक्यातील चांधई गावासाठी काही वर्षांपूर्वी पाणी योजनेचे काम हाती घेण्यात होते. परंतु काम पूर्ण होण्याअगोदर ठेकेदाराला कामाच्या मोबदल्यात ८० टक्के रक्कम अगोदर अदा केल्याने आता या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी चांधई पाणी योजनेचे काम रखडले असून, पाण्याअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तालुक्यातील विविध टंचाईग्रस्त गावांपर्यंत शासन पोचले असताना चांधईमध्ये पाण्याची आवश्यकता असताना कुठल्याच प्रकारची योजना राबविली जात नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो, परंतु चांधई गाव याला अपवाद ठरत आहे. चांधई गावच्या काही अंतरावर पूर्वेस पेजनदी व पश्चिमेस उल्हास नदी असूनही चांधई गावाची तहान भागवण्यास प्रशासन अपुरे पडत आहे. पाणी योजना अपूर्ण असतानाही या पाणी योजनेचे तीन हप्ते म्हणजे जवळजवळ ८० टक्के बिलाचे पैसे ठेकेदाराला देण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या योजनेसाठी विहीर खोदण्यात आली असून सिमेंट टाकी बांधण्यात आली आहे. तसेच गावापर्यंत दोन वर्षांपूर्वी लोखंडी पाइपही पोचले. एवढे करूनही ही पाणी योजना अपूर्ण अवस्थेत आहे.सुमारे सात वर्षांपूर्वी गावाची पाण्याची समस्या सोडविण्साठी तत्कालीन सरपंच प्रिया रसाळ यांनी भारत पेयजल योजना नसरापूर व चांधई गावासाठी मंजूर करून घेतली. त्यापैकी नसरापूर गावची पाणीयोजना तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली. परंतु चांधई गावची पाणी योजना अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. तसेच राजनाल्याचे पाणी चांधईपर्यंत पोचविण्यात येईल, असे आश्वासन वर्षभरपूर्वी देण्यात आले होते. परंतु या आश्वासनाची पूर्तता करण्यात प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.मागील सहा महिन्यांपासून गावकरी नाल्याच्या पाण्यासाठी आग्रही असताना फक्त नाल्याचे काम पूर्ण झाले नाही, अशी सबब पुढे करीत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे यावर्षी अपेक्षित असलेली धान्य व कडधान्य पिके प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी घेऊ शकला नाही. त्यामुळे शेतकरऱ्यांच्या या नुकसानीला फक्त प्रशासन जबाबदार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. राजनाल्याच्या पाण्याचा वापर शेतीसाठी व गृहोपयोगी कामांकरिता केला जातो. (वार्ताहर)१राजनाल्याच्या पाण्याचा वापर शेतीसाठी व गृहोपयोगी कामांकरिता केला जातो. काही काळापासून पाणीच गावात न पोचल्याने गावच्या तोंडचेच पाणी पळाले आहे. गावात असलेल्या विहिरी व हातपंप ओस पडले आहेत. गावातील महिला पाण्यासाठी हातपंपावर तासंतास उभ्या राहताना दिसून येत आहेत. २गावातील महिला पाण्यासाठी हातपंपावर तासंतास उभ्या राहताना दिसून येत आहेत. एक हंडाभर पाण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे.३त्यामुळे या रखडलेल्या योजनेची चौकशी करून लवकरात लवकर ही पाणी योजना पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ही योजा लवकर मार्गी लावून न्याय द्यावा अशीही मागणी के ली जात आहे.