शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

पिण्याच्या पाण्यासाठी केंबुर्लीत वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 02:13 IST

उन्हाळा सुरू होताच गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई डोके वर काढू लागली आहे. काही ठिकाणी निसर्गत:च तर काही ठिकाणी नियोजनाच्या अभावाने पाणीटंचाई सुरू आहे

दासगाव : उन्हाळा सुरू होताच गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई डोके वर काढू लागली आहे. काही ठिकाणी निसर्गत:च तर काही ठिकाणी नियोजनाच्या अभावाने पाणीटंचाई सुरू आहे. अशीच टंचाई सध्या महाड शहरालगत असलेल्या केंबुर्ली गावात सुरू आहे. नदीला पाणी आहे, धरणात पाणी आहे, पण केवळ पाणी योजना जीर्ण झाली आणि त्यावर पैसा खर्ची टाकायचा नाही या शासनाच्या धोरणामुळे केंबुर्ली ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.उन्हाची तीव्रता वाढत असून यामुळे नद्या, नाले आटू लागले आहेत. महाड तालुक्यात मार्च महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. आता याबाबत आराखडा तयार होवू लागला आहे. कोथुर्डे धरणातून पिण्याचे पाणी मिळते. गांधारी नदीतील जॅकवेलद्वारे पाणी उपसा करून केंबुर्ली गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ही योजना १७ वर्षे जुनी आहे. यामुळे या योजनेची दुरवस्था झाली आहे. योजना जुनी झाल्याने त्यावर दुरुस्तीसाठी निधी खर्ची टाकायचा नाही या शासकीय धोरणामुळे केंबुर्ली गावच्या पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती रखडली आहे. वेळोवेळी मागणी करून देखील रायगड जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कें बुर्ली ग्रामस्थांच्या समोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.केंबुर्ली गावात सुमारे १२०० लोकवस्ती असून मोहल्ला, बौद्धवाडी आणि इतर पाच वाड्या आहेत. केंबुर्ली ग्रामस्थ पावसाळ्याचे चार महिने ओढ्याचे पाणी वापरतात. तर नंतर नळ पाणीपुरवठा योजना आणि गावातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापर करतात. पिण्याच्या पाण्यासाठी गावात केवळ दोन विहिरी आहेत. पण या विहिरींना पाणी देखील पुरेसे नसल्याने नळ पाणीपुरवठा योजनेवरच केंबुर्ली ग्रामस्थांना सर्वस्वी अवलंबून राहावे लागते अशी परिस्थिती आहे. या विहिरी देखील एक किमी अंतरावर असल्याने सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.केंबुर्ली ग्रामस्थ दासगाव पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन व्हॉल्ववरून टपकणारे पाणी भरताना दिसत आहेत. पाणीपुरवठा योजनेत बिघाड झाला तर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावतो. शहर जवळ असल्याने रिक्षा, सायकल अगर दुचाकीवरून ग्रामस्थ पिण्याचे पाणी शहरातून आणतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात श्रम आणि वेळ वाया जातो. उन्हाळ्यात टंचाई काळात पंचायत समितीकडून पाण्याचा टँकर मिळत असला तरी आता पाण्याचे काय ? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा आहे.नांदगाव : मुरुड तालुक्यातील विहुर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणारे विहुर धरण आटल्याने सर्व ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. विहुर धरणाच्या पिण्याच्या पाण्यावर सुमारे २५ हजार लोकांचे जीवन अवलंबून आहे. आताच पाण्याची टंचाई होत असल्याने एप्रिल, मे महिन्यात काय स्थिती राहील यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तेव्हा योग्य ते नियोजन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.> कर्जतमधील ३४ गावे, ४१ वाड्यांमध्ये पाणीटंचाईकर्जत : तालुक्यात गतवर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे यावर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला अनेक गावे-वाड्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही दिवसांनी टँकर सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात आदिवासी आणि दुर्गम भागात निर्माण होणारी पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. आराखडा तयार करताना तालुक्यात गावपातळीवर सुरू असलेल्या नळपाणी योजनांची कामे, जलसंधारण अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा विचार केला. त्यानुसार तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे, वाड्यांची नावे निश्चित करून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कळंब (गावठाण), कुंडलज, जांभीवली, अंत्राट वरेडी, बोरगाव, ओलमण, मूळगाव, खांडपे, कोंदिवडे, बीड, नेवाळी, लाडीवली, तिवणे (वासरे), दहीगाव, वरई, आडीवली, आर्ढे, पाली गाव, आंबोट, पोटल, किरवली, सालपे, कडाव, सावळा, हेदवली, गुडवण, किकवी, आषाणे, कोषाणे, मोग्रज, माणगाव (खांडपे), पोसरी, तिवरे यांचा सामावेश आहे. तर वाड्यांमध्ये टाकाची वाडी-दामत, खांडसवाडी, वेणगाव कातकरवाडी, भडवळ कातकरवाडी, डोणेवाडी, नवसूची वाडी, जांभूळवाडी (वारे), हाऱ्याची वाडी आदींचा सामावेश आहे.