शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या निर्मितीविषयी उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:31 IST

तलावांचे सुशोभीकरण सुरू । दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कायम

योगेश पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई या आधुनिक शहरात गणपती आणि देवींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची आवश्यकता आणि मागणी असताना त्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेने निर्माण केलेल्या तलावात मूर्तींचे विसर्जन केले जात असून, गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने तलाव परिसराची डागडुजी आणि सुशोभीकरण करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, तलावातील दुर्गंधीयुक्त पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष असून तलावात विसर्जनाचे काम करणाºया महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कायम आहे.

नवी मुंबई शहर हे २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाते. महापालिकेच्या माध्यमातून शहरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामुळे शहराची वेगळी ओळखही निर्माण झाली आहे. शहरात महापालिकेच्या माध्यमातून २४ तलाव बांधण्यात आले आहेत. तलावाजवळील परिसर सुशोभित करण्यात आले असून, अनेक तलावांजवळ उद्याने बनविण्यात आली आहेत. शहरातील तलावांमधील पाण्यात कपडे धुणे आणि अंघोळ करण्यास तसेच तलावात निर्माल्य टाकण्यास मनाई असल्याचे फलकही बसविण्यात आले आहेत. अनेक तलावांजवळ सुरक्षारक्षक नसल्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. शहरातील नागरिकांना देवी आणि गणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी विसर्जन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शहरात २३ ठिकाणी मूर्तींचे विसर्जन केले जाते. १८ तलावांवर विसर्जन घाटदेखील बांधण्यात आले आहेत.

मूर्तींमुळे तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचत असल्याने तलावाच्या मध्यभागी भिंत बांधून तलावाच्या अर्ध्या भागात मूर्तींचे विसर्जन केले जाते. दरवर्षी तलावांमधील गाळ काढला जात नसल्याने तलावातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. अनेक तलावातील पाण्यावर शेवाळ पसरलेले असून याकडेही महापालिकेच्या माध्यमातून दुर्लक्ष होते. गणेशोत्सव जवळ आल्यावर तलावातील पाण्यावर तरंगणारा कचरा आणि तलाव परिसर स्वच्छ केला जातो. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या सफाई कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येते. विसर्जनाच्या दिवशी पालिका कर्मचाºयांना दिवसभर तलावातील पाण्यात काम करावे लागते. अस्वच्छ पाण्यामुळे या कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून नागरिक इको फ्रेंडली मूर्तींना प्राधान्य देत असून, अनेक नागरिकांनी इको फ्रेंडली मूर्तींचे इमारतीच्या पिंपातील पाण्यात विसर्जन केले आहे. २०१० साली गणपती विसर्जन काळात पालिकेच्या माध्यमातून शहरातील तीन तलावांजवळ कृत्रिम तलाव बनविण्यात आले होते. या उपक्र माला चांगला प्रतिसाद दिला होता; परंतु त्यानंतर पुन्हा असा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला नाही. महापालिकेने कृत्रिम तलाव बनवावेत, अशी अनेक नागरिकांची मागणी असून पालिका कृत्रिम तलावासाठी उदासीन असल्याचा आरोप होत आहे.गणेशमूर्तींची आकडेवारीवर्ष गणेश मूती गौरी२०१६ ३३५४४ १०६५२०१७ ३३७५३ ११३८२०१८ ३३९४५ १३२९विभाग संख्याबेलापूर ५नेरु ळ २वाशी २तुर्भे ३विभाग संख्याकोपरखैरणे ३घणसोली ४ऐरोली ३दिघा १ 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई