शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या निर्मितीविषयी उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:31 IST

तलावांचे सुशोभीकरण सुरू । दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कायम

योगेश पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई या आधुनिक शहरात गणपती आणि देवींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची आवश्यकता आणि मागणी असताना त्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेने निर्माण केलेल्या तलावात मूर्तींचे विसर्जन केले जात असून, गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने तलाव परिसराची डागडुजी आणि सुशोभीकरण करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, तलावातील दुर्गंधीयुक्त पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष असून तलावात विसर्जनाचे काम करणाºया महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कायम आहे.

नवी मुंबई शहर हे २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाते. महापालिकेच्या माध्यमातून शहरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामुळे शहराची वेगळी ओळखही निर्माण झाली आहे. शहरात महापालिकेच्या माध्यमातून २४ तलाव बांधण्यात आले आहेत. तलावाजवळील परिसर सुशोभित करण्यात आले असून, अनेक तलावांजवळ उद्याने बनविण्यात आली आहेत. शहरातील तलावांमधील पाण्यात कपडे धुणे आणि अंघोळ करण्यास तसेच तलावात निर्माल्य टाकण्यास मनाई असल्याचे फलकही बसविण्यात आले आहेत. अनेक तलावांजवळ सुरक्षारक्षक नसल्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. शहरातील नागरिकांना देवी आणि गणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी विसर्जन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शहरात २३ ठिकाणी मूर्तींचे विसर्जन केले जाते. १८ तलावांवर विसर्जन घाटदेखील बांधण्यात आले आहेत.

मूर्तींमुळे तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचत असल्याने तलावाच्या मध्यभागी भिंत बांधून तलावाच्या अर्ध्या भागात मूर्तींचे विसर्जन केले जाते. दरवर्षी तलावांमधील गाळ काढला जात नसल्याने तलावातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. अनेक तलावातील पाण्यावर शेवाळ पसरलेले असून याकडेही महापालिकेच्या माध्यमातून दुर्लक्ष होते. गणेशोत्सव जवळ आल्यावर तलावातील पाण्यावर तरंगणारा कचरा आणि तलाव परिसर स्वच्छ केला जातो. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या सफाई कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येते. विसर्जनाच्या दिवशी पालिका कर्मचाºयांना दिवसभर तलावातील पाण्यात काम करावे लागते. अस्वच्छ पाण्यामुळे या कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून नागरिक इको फ्रेंडली मूर्तींना प्राधान्य देत असून, अनेक नागरिकांनी इको फ्रेंडली मूर्तींचे इमारतीच्या पिंपातील पाण्यात विसर्जन केले आहे. २०१० साली गणपती विसर्जन काळात पालिकेच्या माध्यमातून शहरातील तीन तलावांजवळ कृत्रिम तलाव बनविण्यात आले होते. या उपक्र माला चांगला प्रतिसाद दिला होता; परंतु त्यानंतर पुन्हा असा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला नाही. महापालिकेने कृत्रिम तलाव बनवावेत, अशी अनेक नागरिकांची मागणी असून पालिका कृत्रिम तलावासाठी उदासीन असल्याचा आरोप होत आहे.गणेशमूर्तींची आकडेवारीवर्ष गणेश मूती गौरी२०१६ ३३५४४ १०६५२०१७ ३३७५३ ११३८२०१८ ३३९४५ १३२९विभाग संख्याबेलापूर ५नेरु ळ २वाशी २तुर्भे ३विभाग संख्याकोपरखैरणे ३घणसोली ४ऐरोली ३दिघा १ 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई