शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

नवी मुंबई पालिकेकडे पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 02:45 IST

जल अमृत योजनेतंर्गत जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. त्या काळात पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. तीन वर्षांपुरते नवी मुंबई महानगरपालिकेकडून वीस एमएलडी पाणी देण्याचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आली आहे.

कळंबोली : जल अमृत योजनेतंर्गत जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. त्या काळात पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. तीन वर्षांपुरते नवी मुंबई महानगरपालिकेकडून वीस एमएलडी पाणी देण्याचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. महापालिकेला कायमस्वरूपी धरण देण्याबाबत स्मरणपत्र देण्यात आले.पनवेलची लोकवस्ती सहा लाखांपेक्षा जास्त आहे. महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याकरिता देहरंग धरण वगळता इतर कोणताच मालकीचा स्रोत नाही. या धरणाची क्षमता कमी असल्याने दररोज १० ते १२ एमएलडी पाणी उपलब्ध होते. धरण आटल्यानंतर दोन महिने पाणीच मिळत नाही. परिणामी एमजेपी आणि एमआयडीसीवर पाण्याकरिता अवलंबून रहावे लागते. पनवेल शहर, नवीन पनवेल व कळंबोलीला ८० एमएलडीपेक्षा जास्त पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवले जाते. मात्र वारंवार शटडाउन, नदीच्या पात्रात पाण्याची कमतरता, वीजपुरवठा खंडित होणे, जुनाट जलवाहिन्या यामुळे मागणीप्रमाणे तसेच नियमित पाणीपुरवठा होत नाही. जल अमृत योजनेतंर्गत पाचशे कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. त्याअंंतर्गत एमजेपीच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. कळंबोली आणि इतर ठिकाणच्या अंतर्गत भागात नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. एप्रिल किंवा मे महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. मात्र ते पूर्णत्वास येण्याकरिता जवळपास तीन वर्षे कालावधी अपेक्षित आहे. वाहिन्या बदली करताना पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचा मुद्दा महापौर चौतमोल यांनी जलसंपदा मंत्र्यांना दिलेल्या स्मरणपत्रात उपस्थित केला. पनवेल परिसराला पाणीपुरवठा या कालावधीत होवू शकणार नाही. यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे पाणीपुरवठा योजनेतून वीस एमएलडी पाणी पनवेलला दिले जावे, तसा करारनामा करण्यात यावा अशी मागणी महापौरांनी केली. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत आदी उपस्थित होते.पनवेलकरांकरिता स्वतंत्र व्यवस्था असावीपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तहान भागविण्याकरिता स्वतंत्र धरण द्यावे अशी मागणी सुध्दा जलसंपदा मंत्र्यांकडे करण्यात आली. जेणेकरून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही.