शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नवी मुंबई पालिकेकडे पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 02:45 IST

जल अमृत योजनेतंर्गत जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. त्या काळात पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. तीन वर्षांपुरते नवी मुंबई महानगरपालिकेकडून वीस एमएलडी पाणी देण्याचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आली आहे.

कळंबोली : जल अमृत योजनेतंर्गत जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. त्या काळात पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. तीन वर्षांपुरते नवी मुंबई महानगरपालिकेकडून वीस एमएलडी पाणी देण्याचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. महापालिकेला कायमस्वरूपी धरण देण्याबाबत स्मरणपत्र देण्यात आले.पनवेलची लोकवस्ती सहा लाखांपेक्षा जास्त आहे. महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याकरिता देहरंग धरण वगळता इतर कोणताच मालकीचा स्रोत नाही. या धरणाची क्षमता कमी असल्याने दररोज १० ते १२ एमएलडी पाणी उपलब्ध होते. धरण आटल्यानंतर दोन महिने पाणीच मिळत नाही. परिणामी एमजेपी आणि एमआयडीसीवर पाण्याकरिता अवलंबून रहावे लागते. पनवेल शहर, नवीन पनवेल व कळंबोलीला ८० एमएलडीपेक्षा जास्त पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवले जाते. मात्र वारंवार शटडाउन, नदीच्या पात्रात पाण्याची कमतरता, वीजपुरवठा खंडित होणे, जुनाट जलवाहिन्या यामुळे मागणीप्रमाणे तसेच नियमित पाणीपुरवठा होत नाही. जल अमृत योजनेतंर्गत पाचशे कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. त्याअंंतर्गत एमजेपीच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. कळंबोली आणि इतर ठिकाणच्या अंतर्गत भागात नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. एप्रिल किंवा मे महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. मात्र ते पूर्णत्वास येण्याकरिता जवळपास तीन वर्षे कालावधी अपेक्षित आहे. वाहिन्या बदली करताना पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचा मुद्दा महापौर चौतमोल यांनी जलसंपदा मंत्र्यांना दिलेल्या स्मरणपत्रात उपस्थित केला. पनवेल परिसराला पाणीपुरवठा या कालावधीत होवू शकणार नाही. यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे पाणीपुरवठा योजनेतून वीस एमएलडी पाणी पनवेलला दिले जावे, तसा करारनामा करण्यात यावा अशी मागणी महापौरांनी केली. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत आदी उपस्थित होते.पनवेलकरांकरिता स्वतंत्र व्यवस्था असावीपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तहान भागविण्याकरिता स्वतंत्र धरण द्यावे अशी मागणी सुध्दा जलसंपदा मंत्र्यांकडे करण्यात आली. जेणेकरून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही.