शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

कोकण, कर्नाटकी हापूसला मागणी

By admin | Updated: March 28, 2017 05:31 IST

सर्वाधिक आंबा विक्री ही नवी मुंबई बाजार समितीमध्ये होत असून सिझन सुरू होताच बाजारात फळांच्या राजाची मागणी सुरू होते.

प्राची सोनवणे / नवी मुंबईसर्वाधिक आंबा विक्री ही नवी मुंबई बाजार समितीमध्ये होत असून सिझन सुरू होताच बाजारात फळांच्या राजाची मागणी सुरू होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजारात ६७ हजार ३९२ क्रेट आंब्याच्या पेटींची आवक झाली आहे. दिवसाला ३१३ ट्रक आणि टेम्पोची आवक होत असून यामध्ये कोकण आणि कर्नाटकी आंब्याचा समावेश आहे. नोटाबंदीनंतर बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असला तरी आंब्याची चव चाखण्यासाठी मात्र ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. आंब्याचे दर नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांकडून अपेक्षित मागणी होत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दक्षिणेकडून येणारा हापूस हलक्या प्रतिचा आहे. परंतु त्याचा भाव कमी असल्याने व्यापारी तो आंबा खरेदी करून घेवून जात असून ग्राहकांना देवगड हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे. ग्राहकांनी आंबा घेताना फसवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन व्यापारी वर्गाकडून करण्यात आले आहे. अधिकृत व नियमित फळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनच आंबा खरेदी करावा, असे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी ४० हजार पेट्यांची आवक झाली होती, यंदा मात्र यामध्ये वाढ झाली असून ६७ हजार पेट्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळ बाजारातील व्यापारी संजय पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडाभरापासूनच बाजारातील आवक वाढली असून कर्नाटकी तसेच कोकणातील हापूस, बदामी, पायरी, तोतापुरी, केसर, लालबाग यांनाही मागणी आहे. वाशीतील घाऊक बाजारपेठेत कर्नाटकी हापूस ५० ते १०० रुपये किलो या दराने आहे. कोकणातील हापूस आंबा ९० ते २०० रुपये, बदामी ४० ते ६० रुपये किलो, लालबाग २० ते २५ रुपये किलो, तोतापुरी १५ रुपये किलो आणि केसर १०० रुपये किलो या दराने उपलब्ध आहे.दर स्थिर राहणार नोटाबंदीचा परिणाम बाजारातील व्यवहारांवर असला तरी देखील आंब्याची मागणी मात्र घटलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न वाढले असून त्याबरोबरीनेच ग्राहकांची मागणीही वाढत आहे. मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर राहणार अशी माहिती उपसचिव व बाजार समिती अधिकारी सीताराम कावरके यांनी दिली.