शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

कोकण, कर्नाटकी हापूसला मागणी

By admin | Updated: March 28, 2017 05:31 IST

सर्वाधिक आंबा विक्री ही नवी मुंबई बाजार समितीमध्ये होत असून सिझन सुरू होताच बाजारात फळांच्या राजाची मागणी सुरू होते.

प्राची सोनवणे / नवी मुंबईसर्वाधिक आंबा विक्री ही नवी मुंबई बाजार समितीमध्ये होत असून सिझन सुरू होताच बाजारात फळांच्या राजाची मागणी सुरू होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजारात ६७ हजार ३९२ क्रेट आंब्याच्या पेटींची आवक झाली आहे. दिवसाला ३१३ ट्रक आणि टेम्पोची आवक होत असून यामध्ये कोकण आणि कर्नाटकी आंब्याचा समावेश आहे. नोटाबंदीनंतर बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असला तरी आंब्याची चव चाखण्यासाठी मात्र ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. आंब्याचे दर नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांकडून अपेक्षित मागणी होत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दक्षिणेकडून येणारा हापूस हलक्या प्रतिचा आहे. परंतु त्याचा भाव कमी असल्याने व्यापारी तो आंबा खरेदी करून घेवून जात असून ग्राहकांना देवगड हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे. ग्राहकांनी आंबा घेताना फसवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन व्यापारी वर्गाकडून करण्यात आले आहे. अधिकृत व नियमित फळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनच आंबा खरेदी करावा, असे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी ४० हजार पेट्यांची आवक झाली होती, यंदा मात्र यामध्ये वाढ झाली असून ६७ हजार पेट्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळ बाजारातील व्यापारी संजय पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडाभरापासूनच बाजारातील आवक वाढली असून कर्नाटकी तसेच कोकणातील हापूस, बदामी, पायरी, तोतापुरी, केसर, लालबाग यांनाही मागणी आहे. वाशीतील घाऊक बाजारपेठेत कर्नाटकी हापूस ५० ते १०० रुपये किलो या दराने आहे. कोकणातील हापूस आंबा ९० ते २०० रुपये, बदामी ४० ते ६० रुपये किलो, लालबाग २० ते २५ रुपये किलो, तोतापुरी १५ रुपये किलो आणि केसर १०० रुपये किलो या दराने उपलब्ध आहे.दर स्थिर राहणार नोटाबंदीचा परिणाम बाजारातील व्यवहारांवर असला तरी देखील आंब्याची मागणी मात्र घटलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न वाढले असून त्याबरोबरीनेच ग्राहकांची मागणीही वाढत आहे. मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर राहणार अशी माहिती उपसचिव व बाजार समिती अधिकारी सीताराम कावरके यांनी दिली.