शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

पनवेल महापालिकेला हवे स्वतंत्र पोलीस ठाणे, आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 03:40 IST

अतिक्रमण हटविताना महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. नुकतेच पालिकेच्या दोन कर्मचा-यावर हल्ले झाले.

पनवेल  - अतिक्रमण हटविताना महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. नुकतेच पालिकेच्या दोन कर्मचाºयावर हल्ले झाले. या विषयाची गंभीर दखल घेत आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेला स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थापना करण्याची मागणी गृहविभागाकडे केली आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिले महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी अतिक्र मणावर कारवाई करून शहरे स्वच्छ केली. महापालिकेचे दुर्लक्ष झाले की पुन्हा व्यावसायिक आपले बस्तान बसवितात. अतिक्र मण पथकांतील कर्मचारी आणि नागरिक, व्यावसायिकांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी अतिक्र मणावर कारवाई करण्यासाठी चार स्वतंत्र पथके नेमण्याचा निर्णय घेतला. मात्र, महापालिकेकडे असलेल्या सुरक्षा मंडळाच्या सुरक्षारक्षकांचा धाक नसल्यामुळे वादाचे प्रमाण वाढून, कळंबोलीत कचºयाच्या वादातून एका कर्मचा-यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यापूर्वी कळंबोलीचे प्रभाग अधीक्षक भगवान पाटील यांच्यावर हल्ला झाला होता. तर मागील आठवड्यात पनवेलचे प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांच्यावरही हल्ला झाला. वारंवार होणारे हल्ले लक्षात घेऊन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिकेसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, असा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेच्या अतिक्र मण पथकांत पोलीस असल्यास हल्ल्यासारख्या घटना होणार नाहीत.पोलीस ठाण्याची रचनास्वतंत्र पोलीस ठाण्यात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक, १६ सशस्त्र पोलीस हवालदार, चार महिला पोलीस हवालदार अशा एकूण २२ कर्मचा-यांचे हे पोलीस ठाणे असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :panvelपनवेल