शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

खारघर स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 04:47 IST

लाकडांअभावी अंत्यविधीसाठी जावे लागले बेलापूरला; सिडकोच्या निष्काळजीपणाविषयी नागरिकांमध्ये संताप

- वैभव गायकरपनवेल : खारघर शहरातील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडांचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना शहराबाहेर अंत्यविधी करावा लागत आहे. एकीकडे खारघर शहर हे सिडकोच्या स्मार्ट सिटीच्या यादीत सर्वप्रथम आहे. मात्र, अंत्यविधीसाठी लाकडेही उपलब्ध होऊ शकत नसल्याने मृतदेहाची अवहेलना सुरू असल्याचे विदारक चित्र दुसरीकडे दिसून येत आहे.खारघर सेक्टर-१४ या ठिकाणी सिडकोने उभारलेली स्मशानभूमी असून, तिची अवस्था दयनीय झाली आहे. मात्र, पर्याय नसल्याने नातेवाइकांना याच ठिकाणी अंत्यविधी करावे लागत आहेत. शुक्र वारी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या एका कुटुंबीयाला स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध नसल्याने बेलापूर या ठिकाणी जाऊन अंत्यविधी करावे लागले. एकविसाव्या शतकातील शहर म्हणून बिरु दावली मिरवणाºया सिडको प्रशासनाला हे कृत्य शोभणारे नाही. दु:खाचे डोंगर कोसळलेले शोकाकुल कुटुंब याबाबत वाच्यता करण्याच्या मनस्थितीतही नव्हते. विशेष म्हणजे, सिडको मार्फत शहरातील स्मशानभूमीच्या देखरेखीसाठी कोट्यवधी रुपये कंत्राटदाराला दिले जातात. मात्र, एवढे पैसे खर्च करूनही अंत्यविधीसाठी वेळेवर लाकडे उपलब्ध होत नाहीत, हे दुर्दैव. खारघर नोड हे पनवेल महापालिकेच्या अखत्यारीत येत असले, तरी सिडको नोडचे हस्तांतर झाले नसल्याने पालिका आपली जबाबदारी सिडकोकडे झटकत आहे. मात्र, हस्तांतराचे कारण पुढे करीत सिडकोदेखील विविध विकासकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील स्मशानभूमींची अवस्था आणखी बिकटपनवेल महानगरपालिका हद्दीत २९ गावांचा समावेश आहे. यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरित स्मशानभूमीत मृतदेह ठेवण्यासाठी देखील योग्य जागा नाही. पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे, तसेच पालिका प्रशासनदेखील याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.जबाबदारी सर्वस्वी सिडकोचीखारघर नोडही पनवेल महापालिकेत समाविष्ट झाले असले, तरी या नोडचे हस्तांतर अद्याप पालिकेकडे झालेले नाही, त्यामुळे स्मशानभूमीची देखरेख पूर्णपणे सिडकोची जबाबदारी आहे.- जमीन लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिकापनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने परिसराच्या विकासाबाबत हात झटकल्याचे दिसून येत आहे. एकीकडे नवी मुंबई महानगरपालिका अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करून देत असताना, खारघरमधील स्मशानभूमीत पैसे खर्चूनही लाकडे मिळत नाहीत. नागरिकांनी या संदर्भात तक्रार केल्यावर याबाबत पनवेल महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.- जयेश गोगरी, कार्याध्यक्ष, शाश्वत फाउंडेशन, खारघर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई