शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वणव्यांमुळे वनसंपदेची हानी

By admin | Updated: May 13, 2016 02:37 IST

रोहा तालुक्यात डोंगरांना सतत वणवे लागत असल्याने येथील वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या येथील पर्वत रांगा गेली

मिलिंद अष्टीवकर, रोहारोहा तालुक्यात डोंगरांना सतत वणवे लागत असल्याने येथील वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या येथील पर्वत रांगा गेली आठ दिवस सतत आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने झाडेझुडपे, गवत जळून खाक झाल्याने परिसरातील हजारो जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. मागील दोन महिन्यांत डोंगरांमध्ये सातत्याने हे वणवे पेटलेले दिसून येत आहेत. गेल्या ८ दिवसांत ५ ठिकाणी वणवे लागले होते. रोहा वन विभागाची टीम हे पेटलेले वणवे विझविण्याचा प्रयत्न करतात,यासाठी त्यांना काही ठिकाणी गावकऱ्यांची मदत मिळत असली तरी जीव धोक्यात घालून वनपाल ही वाढत जाणारी आग रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.रोहा तालुका हा चहुबाजूंनी डोगररांगांनी बहरलेला आहे. उन्हाळ्यात मार्च, एप्रिल आणि मेमध्ये येथील डोंगरांना सतत वणवे लागण्याचे प्रकार गेल्या आठ-दहा दिवसांपासून घडत आहेत. तालुक्यातील कळसगिरी, हनुमान टेकडी, पाले, मढाली, खैरवाडी आणि अवचितगड मेढा पंचक्र ोशी आदी वरकस ठिकाणी वणवे लागल्याने वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सायंकाळी व रात्रीच्या वेळी येथील डोंगरमाथा आगीने होरपळत असल्याचे दिसून येते. वणव्यांची तीव्रता फार मोठी असून धुराचे लोट नजरेस पडतात. त्यातच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे वन्यप्राणी लोकवस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.या वणव्यांमुळे तालुक्यातील जंगलात आढळणारे रानडुकरे, भेकर, ससे, कोल्हे, साळीदर, पोपट, मोर यासह खारींच्या जाती नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच या वणव्यांमुळे वरकस भागात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या आंबा, काजू आदी फळबागांची व शेतीची हानी झाल्यास नुकसानभरपाई देण्याबाबत वनविभागाकडे कोणतीही तरतूद नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरालगत कळसगिरीचा माथा ही उन्हाळ्यात नेहमी पेटलेलाच दिसून येतो. सुकेळी येथे लागणाऱ्या वणव्याची तीव्रता फार मोठी असते. मागे खांबच्या जंगलात सतत ८ दिवस आगीचे लोट दिसून येत होते. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हा धुरांडा सहन करीत प्रवास करावा लागत होता. वणवे लागलेल्या बहुतांशी ठिकाणी जंगल गावानजीक असल्याने ग्रामस्थांनी धसका घेतला आहे.