शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यांमुळे वनसंपदेची हानी

By admin | Updated: May 13, 2016 02:37 IST

रोहा तालुक्यात डोंगरांना सतत वणवे लागत असल्याने येथील वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या येथील पर्वत रांगा गेली

मिलिंद अष्टीवकर, रोहारोहा तालुक्यात डोंगरांना सतत वणवे लागत असल्याने येथील वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या येथील पर्वत रांगा गेली आठ दिवस सतत आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने झाडेझुडपे, गवत जळून खाक झाल्याने परिसरातील हजारो जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. मागील दोन महिन्यांत डोंगरांमध्ये सातत्याने हे वणवे पेटलेले दिसून येत आहेत. गेल्या ८ दिवसांत ५ ठिकाणी वणवे लागले होते. रोहा वन विभागाची टीम हे पेटलेले वणवे विझविण्याचा प्रयत्न करतात,यासाठी त्यांना काही ठिकाणी गावकऱ्यांची मदत मिळत असली तरी जीव धोक्यात घालून वनपाल ही वाढत जाणारी आग रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.रोहा तालुका हा चहुबाजूंनी डोगररांगांनी बहरलेला आहे. उन्हाळ्यात मार्च, एप्रिल आणि मेमध्ये येथील डोंगरांना सतत वणवे लागण्याचे प्रकार गेल्या आठ-दहा दिवसांपासून घडत आहेत. तालुक्यातील कळसगिरी, हनुमान टेकडी, पाले, मढाली, खैरवाडी आणि अवचितगड मेढा पंचक्र ोशी आदी वरकस ठिकाणी वणवे लागल्याने वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सायंकाळी व रात्रीच्या वेळी येथील डोंगरमाथा आगीने होरपळत असल्याचे दिसून येते. वणव्यांची तीव्रता फार मोठी असून धुराचे लोट नजरेस पडतात. त्यातच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे वन्यप्राणी लोकवस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.या वणव्यांमुळे तालुक्यातील जंगलात आढळणारे रानडुकरे, भेकर, ससे, कोल्हे, साळीदर, पोपट, मोर यासह खारींच्या जाती नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच या वणव्यांमुळे वरकस भागात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या आंबा, काजू आदी फळबागांची व शेतीची हानी झाल्यास नुकसानभरपाई देण्याबाबत वनविभागाकडे कोणतीही तरतूद नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरालगत कळसगिरीचा माथा ही उन्हाळ्यात नेहमी पेटलेलाच दिसून येतो. सुकेळी येथे लागणाऱ्या वणव्याची तीव्रता फार मोठी असते. मागे खांबच्या जंगलात सतत ८ दिवस आगीचे लोट दिसून येत होते. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हा धुरांडा सहन करीत प्रवास करावा लागत होता. वणवे लागलेल्या बहुतांशी ठिकाणी जंगल गावानजीक असल्याने ग्रामस्थांनी धसका घेतला आहे.