शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

विजयासाठी उमेदवारांचे देवांना साकडे

By admin | Updated: May 10, 2017 00:27 IST

पनवेल महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची धांदल उडाली आहे. साऱ्याच पक्षांचे उमेदवार

मयूर तांबडे । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची धांदल उडाली आहे. साऱ्याच पक्षांचे उमेदवार सकाळी मंदिर व मशीदमध्ये जाऊन देवदेवतांना विजयाचे साकडे घालत आहेत. धार्मिक स्थळांना भेट देत अनेक उमेदवारांनी प्रचाराला सुरु वात केली.प्रमुख पक्षांसह अपक्षांनी देखील विजयासाठी देवांना साकडे घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देवालयांमध्ये एकच गर्दी केली आहे. प्रचारांचे नारळ फोडून उमेदवार प्रचाराला लागले आहेत. शहरातील मंदिरात आरती करून काहींनी अभिषेक घातले. महापालिका निवडणुकीत पनवेल शहरात वीस प्रभाग असून ७८ नगरसेवक निवडून येणार आहेत. ६३६ उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज भरले होते. यातील ४९ अर्ज अवैध ठरले आहेत. निवडणुकीसाठी झालेल्या छाननीत सूचक, अनुमोदक वेगळ्या प्रभागातील असणे, दोन वेगवेगळ्या प्रभागात अर्ज सादर करणे यामुळे हे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. नावडे येथील केंद्रातून ९ (प्रभाग क्र .१,२,३,), खारघर केंद्रातून ७ (प्रभाग ४,५,६,) , कळंबोली केंद्रातून १ (प्रभाग ७,८,९,१०) , कामोठे केंद्रातून १५ (प्रभाग ११,१२,१३) ,नवीन पनवेल केंद्रातून ४ ( प्रभाग १४,१५,१६), आणि पनवेल केंद्रातून १३ (प्रभाग १७,१८,१९,२०) असे एकूण ४९ अर्ज अवैध ठरले. एकूण ६३६ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात उरले आहेत.सर्वच पक्षांसह अपक्षांनी देखील महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. मोठ्या संख्येत येथून उमेदवार लढत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी साऱ्याच पक्षांनी आपला प्रचाराचा मेगाप्लॅन तयार केला आहे. ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. १२ मे रोजी चिन्हवाटप आणि उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. त्यामुळे पनवेल परिसरात रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी सर्वप्रथम देवांना विजयासाठी साकडे घातल्याचे दिसून आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येत मंदिर, मशीद, गुरु द्वारा व बुद्धविहार आहेत. या सर्वच ठिकाणी उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. उमेदवारांसह मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांना सोबत घेवून विजयी होण्यासाठी देवांना साकडे घालण्यात येत आहे. नारळ, हार, पेढ्यांचा प्रसाद उमेदवारांकडून वाहिला जात आहे. गेल्या दोन ते चार दिवसांपासून महापालिका निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजला आहे. इतरांपेक्षा आपणच कसे सरस राहू यावर प्रत्येक उमेदवार भर देत आहे. २४ मे रोजी मतदान आणि २६ मे रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्र म आहे.