शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

रेल्वे रूळ ओलांडताना तुर्भेत महिलेचा मृत्यू

By admin | Updated: May 31, 2017 06:34 IST

Women, Railma

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: ट्रान्स हार्बर मार्गावर तुर्भे नाक्याजवळ रेल्वे रूळ ओलांडताना चंदाबाई धांजे या महिलेचा मृत्यू झाला. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पादचारी पुलाचे काम मार्गी लागले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. इंदिरानगर चुनाभट्टी येथे राहणाऱ्या चंदाबाई शिवाजी धांजे या सकाळी कामानिमित्त रेल्वे रूळ ओलांडून तुर्भे जनता मार्केटकडे जात होत्या. एक रेल्वे रूळ ओलांडल्यानंतर त्यांना ट्रेन आल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दोन्ही रुळांच्या मध्येच थांबणे पसंत गेले. त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून आलेल्या रेल्वेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईमध्ये सर्वाधिक रेल्वे अपघात याच परिसरामध्ये होत आहेत. यापूर्वी एकाच वेळी तीन व्यक्तींचाही येथे मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अपघातानंतर रेल्वे व महापालिका प्रशासनाने येथे पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे पुन्हा पुन्हा अपघात होवू लागले आहेत. तुर्भे नाका, इंदिरानगर ते बोनसरी मधील नागरिकांना किराणा मालापासून सर्व खरेदी करण्यासाठी तुर्भे जनता मार्केटमध्ये जावे लागत आहे. या परिसरातील विद्यार्थीही शिक्षणासाठी तुर्भे गावातच जात असतात. रोज ८ ते १० हजार नागरिक रेल्वे रूळ ओलांडत असून अपघात होत आहेत. अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शिवसेना शाखा प्रमुख महेश कोठीवाले यांच्यासह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही  केली आहे.