अकोला : उन्हाचा पारा दिवसें-दिवस चढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा फटका बसत आहे. रविवारी उष्माघाताने शहरातील दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका युवतीचा समावेश आहे.खदान परिसरात असलेल्या लहरियानगरमध्ये नातेवाईकांच्या घरी आलेल्या हातरुण येथील रहिवासी मोतीराम शंकर खरप (५७) यांचा रविवार सकाळी मृत्यू झाला. भरउन्हात प्रवास करून आल्याने त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. यासोबतच जेतवननगरमधील रहिवासी रंपाली पंजाबराव इंगळे (१५) हिचा सवरेपचार रुग्णालयात रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री तिला सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिला उष्माघात झाला असल्याचा अंदाज वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
अकोल्यात उष्माघाताने आणखी दोघांचा मृत्यू
By admin | Updated: June 9, 2014 00:16 IST