शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

रेल्वेस्थानक फलाटावर मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:22 IST

सानपाडा रेल्वेस्थानकातील चार क्रमांकाच्या फलाटावर रेल्वेप्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा तयार झाला आहे.

नवी मुंबई : सानपाडा रेल्वेस्थानकातील चार क्रमांकाच्या फलाटावर रेल्वेप्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. त्या ठिकाणच्या भूमिगत केबल वाहिन्यांच्या चेंबरचे झाकण उघडेच असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी एखादा प्रवासी त्यात पडल्यास त्याला प्राणास मुकावे लागू शकते.शहरातील सर्वच रेल्वेस्थानके समस्यांनी ग्रासलेली असतानाच, फलाटांवरही प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. मात्र, प्रशासनाची उदासीनता प्रवाशांच्या जीवावर बेतेल, असा प्रकार सानपाडा स्थानकात पाहावयास मिळत आहे. फलाट क्रमांक चारवरील केबल चेंबरचे झाकण तुटलेले आहे. त्या ठिकाणी नवे झाकण बसवण्याची तातडीची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी त्या ठिकाणी मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. सानपाडा स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणाऱ्या मार्गाच्या फलाटावर हा प्रकार पाहावयास मिळत आहे. फलाटाच्या सुरुवातीलाच हे उघडे चेंबर असल्याने धावत लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेला प्रवासी त्यात पडून जखमी होऊ शकतो. अथवा घाईमध्ये रेल्वेतून उतरणाºया प्रवाशालाही हा खड्डा मृत्यूच्या दाढेत खेचू शकतो; परंतु प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी संबंधित प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, भविष्यात त्या ठिकाणी अशी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा आरोप रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.