शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

दप्तराचे ‘ओझे’ मुख्याध्यापकांच्या खांद्यावर

By admin | Updated: November 11, 2015 00:28 IST

विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय ३0 नोव्हेंबरपर्यंत अमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

प्रशांत शेडगे, पनवेलविद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय ३0 नोव्हेंबरपर्यंत अमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका झाली नाही तर मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही दिला. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. त्याबाबत रायगड जिल्ह्यातील ३८00 शाळांना माहिती देण्यात आली असून हा विषय गांभीर्याने घेण्याचे आदेश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.वेगवेगळे विषय, व्यवसाय, पुस्तके, वह्या, इतर साहित्याने विद्यार्थ्यांची बॅग गच्च भरते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर मोठे ओझे लादल्यासारखे होते. त्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक दप्तराचे ओझे असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्याने शिक्षणाचा मूळ हेतूच बाजूला पडला, असे याचिकेत म्हटले होते. याबाबत न्यायालयाने शासनाकडे विचारणा केली. नेमके उपाय सुचवण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्याने सादर केलेल्या अहवालावर २१ जुलै २0१५ रोजी शासनाने निर्णय घेतला. आवश्यक त्या तयारीसाठी शाळांना महिन्यांचा अवधी दिला. ही मुदत आता ३0 नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्या संपल्या, की विद्यार्थ्यांचे दप्तर आता थोडेसे हलके होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा शिक्षण विभागाकडे हे पत्रक आले आहे. त्यानुसार संबंधित शाळांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा शिक्षण कार्यालयाकडून सांगण्यात आले.रायगड जिल्ह्यात २0३८ जिल्हा परिषद, ८५ नगरपालिका आणि ६00 खाजगी अशा ३८00 शाळा असून त्यांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांची बैठक घेवून अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात येणार आहेत. जर दप्तराचे ओझे कमी झाले नाही तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- शेषराव बढे, जिल्हा शिक्षण अधिकारी, (प्राथमिक विभाग), रायगडसरकारी प्रकाशनांशिवाय इतर पुस्तकांचा अवलंब नको, व्यवसाय, परिसर, कार्यानुभव यांचा अतिरेक करू नये, शाळेतील अभ्यासाशिवाय घरचा अभ्यास मर्यादित ठेवा,उपक्र मांच्या नावाने स्वतंत्र वह्या अन्य पुस्तके ठेवू नये याबाबत विद्यार्थी-पालकांना सूचना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळेत स्वच्छ पाण्याची सोय करण्याबाबत रायगड जिल्ह्यातील सगळ्या शाळांना सूचना देण्यात येणार आहेत. ज्यामुळे पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी करता येणार आहे. संबंधित आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही याची तपासणी करण्याकरिता भरारी पथक नेमण्यात येणार आहेत.