शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

दप्तराचे ‘ओझे’ मुख्याध्यापकांच्या खांद्यावर

By admin | Updated: November 11, 2015 00:28 IST

विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय ३0 नोव्हेंबरपर्यंत अमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

प्रशांत शेडगे, पनवेलविद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय ३0 नोव्हेंबरपर्यंत अमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका झाली नाही तर मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही दिला. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. त्याबाबत रायगड जिल्ह्यातील ३८00 शाळांना माहिती देण्यात आली असून हा विषय गांभीर्याने घेण्याचे आदेश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.वेगवेगळे विषय, व्यवसाय, पुस्तके, वह्या, इतर साहित्याने विद्यार्थ्यांची बॅग गच्च भरते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर मोठे ओझे लादल्यासारखे होते. त्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक दप्तराचे ओझे असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्याने शिक्षणाचा मूळ हेतूच बाजूला पडला, असे याचिकेत म्हटले होते. याबाबत न्यायालयाने शासनाकडे विचारणा केली. नेमके उपाय सुचवण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्याने सादर केलेल्या अहवालावर २१ जुलै २0१५ रोजी शासनाने निर्णय घेतला. आवश्यक त्या तयारीसाठी शाळांना महिन्यांचा अवधी दिला. ही मुदत आता ३0 नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्या संपल्या, की विद्यार्थ्यांचे दप्तर आता थोडेसे हलके होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा शिक्षण विभागाकडे हे पत्रक आले आहे. त्यानुसार संबंधित शाळांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा शिक्षण कार्यालयाकडून सांगण्यात आले.रायगड जिल्ह्यात २0३८ जिल्हा परिषद, ८५ नगरपालिका आणि ६00 खाजगी अशा ३८00 शाळा असून त्यांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांची बैठक घेवून अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात येणार आहेत. जर दप्तराचे ओझे कमी झाले नाही तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- शेषराव बढे, जिल्हा शिक्षण अधिकारी, (प्राथमिक विभाग), रायगडसरकारी प्रकाशनांशिवाय इतर पुस्तकांचा अवलंब नको, व्यवसाय, परिसर, कार्यानुभव यांचा अतिरेक करू नये, शाळेतील अभ्यासाशिवाय घरचा अभ्यास मर्यादित ठेवा,उपक्र मांच्या नावाने स्वतंत्र वह्या अन्य पुस्तके ठेवू नये याबाबत विद्यार्थी-पालकांना सूचना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळेत स्वच्छ पाण्याची सोय करण्याबाबत रायगड जिल्ह्यातील सगळ्या शाळांना सूचना देण्यात येणार आहेत. ज्यामुळे पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी करता येणार आहे. संबंधित आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही याची तपासणी करण्याकरिता भरारी पथक नेमण्यात येणार आहेत.