शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शहरातील धारण तलावांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: May 11, 2017 02:20 IST

ऐरोलीसह शहरातील ११ धारण तलावांचे (होल्डिंग पाँड) अस्तित्व धोक्यात आले आहे. मँग्रोजमुळे तलावांची साफसफाई करता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐरोलीसह शहरातील ११ धारण तलावांचे (होल्डिंग पाँड) अस्तित्व धोक्यात आले आहे. मँग्रोजमुळे तलावांची साफसफाई करता येत नाही. यामुळे भविष्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली किंवा मोठी भरती आल्यास खाडीचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाची परवानगी मिळवून साफसफाईची कामे करण्याची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केली आहे. नवी मुंबई शहर खाडीकिनारी वसले आहे. समुद्राला भरती आली की खाडीचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते. भविष्यात शहराला पुराचा धोका पोहचू नये यासाठी सिडकोने बेलापूर ते ऐरोलीदरम्यान तब्बल ११ धारण तलाव तयार केले आहेत. २०० हेक्टर क्षेत्रफळावर हे तलाव तयार केले आहेत. परंतु मागील काही वर्षामध्ये या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तलावामध्ये खारफुटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऐरोलीमध्ये तब्बल ३० हेक्टर क्षेत्रफळावर दोन धारण तलाव आहेत. पण त्याची साफसफाई झाली नसल्यामुळे त्यामध्ये खारफुटी वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी अशोक पाटील, नगरसेविका संगीता पाटील यांनी वारंवार होल्डिंग पाँडची सफाई करण्याची मागणी केली आहे. परंतु हा प्रश्न उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने प्रशासनाकडून साफसफाई करता येत नाही. यामुळे तलावांचे अस्तित्वच धोक्यात येवू लागले आहे. शक्य तितक्या लवकर गाळ काढण्याचे काम सुरू केले नाही तर भविष्यात धारण तलावांचे अस्तित्व नष्ट होणार असून भविष्यात त्याचा गंभीर परिणाम शहराच्या सुरक्षेवर होणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने साफसफाई करणे किती आवश्यक आहे ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे व हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ऐरोलीप्रमाणे इतर ठिकाणच्या होल्डिंग पाँडची स्थितीही बिकट झाली आहे. वाशी व कोपरखैरणेच्या मध्यभागी असलेल्या होल्डींग पाँडचीही दुरावस्था झाली आहे. शिक्षण मंडळाचे माजी सभापती राम विचारे यांनी वारंवार या होल्डिंग पाँडची साफसफाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. सिडकोने होल्डिंग पाँड बांधला तेव्हा त्यामध्ये खारफुटी नव्हती. भरतीच्या पाण्याबरोबर खारफुटीचे बी तलावामध्ये येवून वृक्ष वाढले आहेत. सॅटेलाइट चित्रांचा आधार घेतला तरी दहा वर्षांपूर्वी तलावामध्ये हे वृक्ष नसल्याचे स्पष्ट होईल असेही त्यांनी वेळोवेळी निदर्शनास आले आहे.